शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच

By विठ्ठल खेळगी | Updated: March 21, 2023 16:26 IST

अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत.

सोलापूर - उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी मंद्रूपचे शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा मुंबईला घेऊन न जाता नोंदी रद्द होईपर्यंत कलेक्टर कचेरीतच मुक्काम ठोकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचेरीतच तळ ठोकून आहेत. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकण्याचा निर्णय घेतला. दिनांक १४ मार्च रोजी हा मोर्चा मंद्रूप येथून निघाला होता. त्यानंतर १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. दोन दिवसात चर्चा करून निर्णय देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत माघार हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गुरुवारी मुंबईत होणार बैठकमंद्रूपच्या शेतकऱ्यांच्या उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्यासंदर्भात गुरुवारी मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. उतारावरील नोंदी कमी झाल्यास मंद्रूपकडे परत जाऊ, अन्यथा मोर्चा मुंबईचे दिशेने रवाना होईल, असे शेतकरी प्रवीण कुंभार यांनी सांगितले.