शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच

By विठ्ठल खेळगी | Updated: March 21, 2023 16:26 IST

अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत.

सोलापूर - उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी मंद्रूपचे शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा मुंबईला घेऊन न जाता नोंदी रद्द होईपर्यंत कलेक्टर कचेरीतच मुक्काम ठोकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचेरीतच तळ ठोकून आहेत. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकण्याचा निर्णय घेतला. दिनांक १४ मार्च रोजी हा मोर्चा मंद्रूप येथून निघाला होता. त्यानंतर १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. दोन दिवसात चर्चा करून निर्णय देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत माघार हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गुरुवारी मुंबईत होणार बैठकमंद्रूपच्या शेतकऱ्यांच्या उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्यासंदर्भात गुरुवारी मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. उतारावरील नोंदी कमी झाल्यास मंद्रूपकडे परत जाऊ, अन्यथा मोर्चा मुंबईचे दिशेने रवाना होईल, असे शेतकरी प्रवीण कुंभार यांनी सांगितले.