शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:19 IST

आनंदश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागरण, ४५ वर्षांपासून झटणारे रायते दाम्पत्य

ठळक मुद्देपर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजेजगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताचीपर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही

महेश कुलकर्णी सोलापूर : पर्यावरणावर जेवढे काम होईल तेवढा मानवाला दिलासा मिळणार आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या पटीत होणारी हानी यामुळे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. पर्यावरणावर काम म्हणजे स्काय इज लिमिट असल्याचे प्रतिपादन गेल्या ४५ वर्षांपासून जनजागृती करणारे डॉ. वासुदेव आणि डॉ. माधवी रायते या दाम्पत्याने  केले.

भारताची लोकसंख्या १२५ कोटींवर गेली आहे. ती वाढतच चालली आहे. त्या तुलनेत पर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक रोप लावून ते जगवले तरी वर्षाला १२५ कोटी झाडे वाढतील. असा संकल्प कोणी करताना दिसत नाही. पर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजे. विशेषत: लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणारे कार्यक्रम सरकारच्या वतीने होताना दिसत नाहीत. जगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताची आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हम दो हमारा एक’ हा कार्यक्रम आता राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

डॉ़ वासुदेव आणि डॉ़ माधवी रायते हे जोडपे १९६९ पासून पर्यावरणविषयक जनजागृती करीत आहे़ भाऊ, बहीण, मुले अशा नऊ जणांच्या कुटुंबाने पर्यावरण जपण्याचा वसा घेतला आहे़ ३० वर्षांपूर्वी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात काम करीत असताना डॉ़ वासुदेव रायते यांनी तिथल्या ओसाड माळरानावर साडेदहा हजार झाडे लावून परिसर हिरवागार केला़ यानंतरच्या काळात राज्यभर शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, युवा वर्ग, संस्था आदी ठिकाणी फिरून निसर्ग ºहासाबाबत जनजागृती केली़ अनेक संस्था, महाविद्यालयांमध्ये वृक्ष लावले़ 

 वडिलांच्या शताब्दीनिमित्त या जोडप्याने ‘आनंदश्री’ प्रतिष्ठान स्थापन करून पर्यावरण जपण्याची चळवळ उभी केली़ सोलापुरात हरिभाई देवकरण, मेडिकल कॉलेज, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी झाडे लावून पर्यावरणविषयक जनजागृती केली़ ३ जानेवारी १९९६ साली कंबर तलावाजवळील ५० एकर माळरानावर लोक, लोकनेते आणि लोकशासनाच्या मदतीने स्मृती उद्यान उभे केले़ साडेतीन हजार झाडे आणि १५ उपवने तयार झाली आहेत़ याशिवाय यांच्या प्रयत्नांतून लहान मुलांसाठी तारांगण पार्क, इको लायब्ररी, निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे़

अवघ्या महाराष्टÑाला हे उद्यान भूषणावह उपक्रम ठरले आहे़ याबरोबरच अलीकडे त्यांनी ४५ वर्षांतील आपल्या सामाजिक उपक्रमांचा अहवाल तयार करून तो इन्कम टॅक्स विभागाला सादर केला़ या विभागाने एसटीजी अंतर्गत देणगीदारांसाठी ‘तहहयात’ करसवलतीचा अधिकार दिला़ जमा झालेल्या रकमेच्या व्याजावर या उद्यानाचे संगोपन हे जोडपे करीत आहे़ त्यांच्या या कार्याची दखल अलीकडे समाजाने आणि शासनाने घेतली़ डॉ़ वासुदेव रायते यांना ‘वसुंधरा’ पुरस्कार तर डॉ़ माधवी रायते यांना ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे़

आज वृक्ष लागवड- रायते दाम्पत्य वर्षभर पर्यावरणाची जनजागृती करीत असते. मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना ते जोपासण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.