शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:19 IST

आनंदश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागरण, ४५ वर्षांपासून झटणारे रायते दाम्पत्य

ठळक मुद्देपर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजेजगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताचीपर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही

महेश कुलकर्णी सोलापूर : पर्यावरणावर जेवढे काम होईल तेवढा मानवाला दिलासा मिळणार आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या पटीत होणारी हानी यामुळे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. पर्यावरणावर काम म्हणजे स्काय इज लिमिट असल्याचे प्रतिपादन गेल्या ४५ वर्षांपासून जनजागृती करणारे डॉ. वासुदेव आणि डॉ. माधवी रायते या दाम्पत्याने  केले.

भारताची लोकसंख्या १२५ कोटींवर गेली आहे. ती वाढतच चालली आहे. त्या तुलनेत पर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक रोप लावून ते जगवले तरी वर्षाला १२५ कोटी झाडे वाढतील. असा संकल्प कोणी करताना दिसत नाही. पर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजे. विशेषत: लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणारे कार्यक्रम सरकारच्या वतीने होताना दिसत नाहीत. जगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताची आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हम दो हमारा एक’ हा कार्यक्रम आता राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

डॉ़ वासुदेव आणि डॉ़ माधवी रायते हे जोडपे १९६९ पासून पर्यावरणविषयक जनजागृती करीत आहे़ भाऊ, बहीण, मुले अशा नऊ जणांच्या कुटुंबाने पर्यावरण जपण्याचा वसा घेतला आहे़ ३० वर्षांपूर्वी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात काम करीत असताना डॉ़ वासुदेव रायते यांनी तिथल्या ओसाड माळरानावर साडेदहा हजार झाडे लावून परिसर हिरवागार केला़ यानंतरच्या काळात राज्यभर शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, युवा वर्ग, संस्था आदी ठिकाणी फिरून निसर्ग ºहासाबाबत जनजागृती केली़ अनेक संस्था, महाविद्यालयांमध्ये वृक्ष लावले़ 

 वडिलांच्या शताब्दीनिमित्त या जोडप्याने ‘आनंदश्री’ प्रतिष्ठान स्थापन करून पर्यावरण जपण्याची चळवळ उभी केली़ सोलापुरात हरिभाई देवकरण, मेडिकल कॉलेज, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी झाडे लावून पर्यावरणविषयक जनजागृती केली़ ३ जानेवारी १९९६ साली कंबर तलावाजवळील ५० एकर माळरानावर लोक, लोकनेते आणि लोकशासनाच्या मदतीने स्मृती उद्यान उभे केले़ साडेतीन हजार झाडे आणि १५ उपवने तयार झाली आहेत़ याशिवाय यांच्या प्रयत्नांतून लहान मुलांसाठी तारांगण पार्क, इको लायब्ररी, निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे़

अवघ्या महाराष्टÑाला हे उद्यान भूषणावह उपक्रम ठरले आहे़ याबरोबरच अलीकडे त्यांनी ४५ वर्षांतील आपल्या सामाजिक उपक्रमांचा अहवाल तयार करून तो इन्कम टॅक्स विभागाला सादर केला़ या विभागाने एसटीजी अंतर्गत देणगीदारांसाठी ‘तहहयात’ करसवलतीचा अधिकार दिला़ जमा झालेल्या रकमेच्या व्याजावर या उद्यानाचे संगोपन हे जोडपे करीत आहे़ त्यांच्या या कार्याची दखल अलीकडे समाजाने आणि शासनाने घेतली़ डॉ़ वासुदेव रायते यांना ‘वसुंधरा’ पुरस्कार तर डॉ़ माधवी रायते यांना ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे़

आज वृक्ष लागवड- रायते दाम्पत्य वर्षभर पर्यावरणाची जनजागृती करीत असते. मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना ते जोपासण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.