शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:19 IST

आनंदश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागरण, ४५ वर्षांपासून झटणारे रायते दाम्पत्य

ठळक मुद्देपर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजेजगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताचीपर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही

महेश कुलकर्णी सोलापूर : पर्यावरणावर जेवढे काम होईल तेवढा मानवाला दिलासा मिळणार आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या पटीत होणारी हानी यामुळे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. पर्यावरणावर काम म्हणजे स्काय इज लिमिट असल्याचे प्रतिपादन गेल्या ४५ वर्षांपासून जनजागृती करणारे डॉ. वासुदेव आणि डॉ. माधवी रायते या दाम्पत्याने  केले.

भारताची लोकसंख्या १२५ कोटींवर गेली आहे. ती वाढतच चालली आहे. त्या तुलनेत पर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक रोप लावून ते जगवले तरी वर्षाला १२५ कोटी झाडे वाढतील. असा संकल्प कोणी करताना दिसत नाही. पर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजे. विशेषत: लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणारे कार्यक्रम सरकारच्या वतीने होताना दिसत नाहीत. जगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताची आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हम दो हमारा एक’ हा कार्यक्रम आता राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

डॉ़ वासुदेव आणि डॉ़ माधवी रायते हे जोडपे १९६९ पासून पर्यावरणविषयक जनजागृती करीत आहे़ भाऊ, बहीण, मुले अशा नऊ जणांच्या कुटुंबाने पर्यावरण जपण्याचा वसा घेतला आहे़ ३० वर्षांपूर्वी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात काम करीत असताना डॉ़ वासुदेव रायते यांनी तिथल्या ओसाड माळरानावर साडेदहा हजार झाडे लावून परिसर हिरवागार केला़ यानंतरच्या काळात राज्यभर शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, युवा वर्ग, संस्था आदी ठिकाणी फिरून निसर्ग ºहासाबाबत जनजागृती केली़ अनेक संस्था, महाविद्यालयांमध्ये वृक्ष लावले़ 

 वडिलांच्या शताब्दीनिमित्त या जोडप्याने ‘आनंदश्री’ प्रतिष्ठान स्थापन करून पर्यावरण जपण्याची चळवळ उभी केली़ सोलापुरात हरिभाई देवकरण, मेडिकल कॉलेज, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी झाडे लावून पर्यावरणविषयक जनजागृती केली़ ३ जानेवारी १९९६ साली कंबर तलावाजवळील ५० एकर माळरानावर लोक, लोकनेते आणि लोकशासनाच्या मदतीने स्मृती उद्यान उभे केले़ साडेतीन हजार झाडे आणि १५ उपवने तयार झाली आहेत़ याशिवाय यांच्या प्रयत्नांतून लहान मुलांसाठी तारांगण पार्क, इको लायब्ररी, निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे़

अवघ्या महाराष्टÑाला हे उद्यान भूषणावह उपक्रम ठरले आहे़ याबरोबरच अलीकडे त्यांनी ४५ वर्षांतील आपल्या सामाजिक उपक्रमांचा अहवाल तयार करून तो इन्कम टॅक्स विभागाला सादर केला़ या विभागाने एसटीजी अंतर्गत देणगीदारांसाठी ‘तहहयात’ करसवलतीचा अधिकार दिला़ जमा झालेल्या रकमेच्या व्याजावर या उद्यानाचे संगोपन हे जोडपे करीत आहे़ त्यांच्या या कार्याची दखल अलीकडे समाजाने आणि शासनाने घेतली़ डॉ़ वासुदेव रायते यांना ‘वसुंधरा’ पुरस्कार तर डॉ़ माधवी रायते यांना ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे़

आज वृक्ष लागवड- रायते दाम्पत्य वर्षभर पर्यावरणाची जनजागृती करीत असते. मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना ते जोपासण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.