शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सुशिक्षितांना शहाणपण यावं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 11:35 IST

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच ...

ठळक मुद्देया फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेलीसर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच शिक्षणाचं आहे. आज गावे, वाड्या, तांडे, साखरशाळा, पालावरच्या शाळांपासून उच्च महाविद्यालये, विद्यापीठ इतकंच काय तर नानाविध देशातील उच्च पदव्याही मिळविण्याची कला शिकलो. एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेली. अक्षरं कळली, ती रेखाटता आली, त्यांचा अर्थ समजला. कळले पण ते अंगी वळले नाहीत म्हणून त्यातील संवेदनशीलता बोथट झाली म्हणूनच आमच्यावर कोणत्याही सावधानतेच्या सूचनांचा, वागण्याविषयीच्या नियमांचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही.

परवा एका कचराकुंडीजवळ एक फलक पाहिला मी़ एक मूर्ख आणि बरंच काही लिहिलं होतं. धूम्रपान करू नये, नो पार्किंग, विविध सिम्बॉल्स, येथे लघवी करू नये, युज मी..लिहिलेले डस्टबीन आरोग्यविषयक नियम, वृक्षारोपण, संवर्धन, बालहक्क विषयक नियम, १४ वर्षांखालील मुलांना काम नको, नो हॉर्न..वगैरे वगैरे हे आणि असेच सारे नियम पालकांचा खरंच एक सुशिक्षित म्हणून आमच्यावर या बाबीचा कितपत परिणाम होतो याचा स्वत:शी प्रामाणिक राहून प्रत्येक सुशिक्षित माणसांनी क्षणभर विचार केला तर लेखशीर्षक खरंच आता सुशिक्षितांना शहाणपण यावं..ही प्रार्थनाच म्हणा हवं तर करणं आज खरंच दुनियादारी करण्याची गरज आहे.

कामावर वेळेवर जावे, आपले नियमित काम वेळेवर पूर्ण करावे, आपल्या अंगी असणारी धमक कुणाशी हेवेदावे करण्यात घालविण्यापेक्षा प्रत्येकाला हेवा वाटावा असं करण्याचा प्रयत्न करावा. आपला व्यवसाय, पेशा, कामातील मूलभूत तत्वनिष्ठा, विचार, कौशल्ये, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये साध्य करण्यासाठी खरंच काहीच करता येऊ शकत नाही का? मी माझ्या पगारावर समाधानी आहे. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का? या फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?

 निरंतर शिक्षण योजना राबविली गेली, त्याची ही चित्तरकथा़ निशाणी डावा अंगठा यासारख्या चित्रपटाद्वारे कशी झाली ते पहातोच पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन ठोस काही उपाययोजना करता येऊ शकतील का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गतिमान जीवनात सावधानता बाळगणं, बाळगण्यासाठीची स्थितरता प्राप्त करणं, तेवढा संयम हवा़ आम्ही कीर्तन, भजन, ओव्या, भारुडे, कथा, सत्संग, प्रवचन, वाचन, ग्रंथवाचन, लेखन, व्याख्यान, श्रवण असे अनेक प्रकार नैमित्तिक करत राहतो. पण आम्ही पुन्हा या साºया गोष्टी समजून उमजून पुन्हा पुन्हा चुकीच्या का करतो? समस्या काय आहेत आम्हाला? का जाणिवा संपत आहेत? का जीवनात देखलेपण, झगमगाटाचं प्रदर्शन, एकट्यातला बटबटीतपणा वाढत आहे. आमच्या नेमप्लेट खालील डिग्रीतली फिलॉसॉफी जीवनात दिसत नाही किंवा धुसर दिसते. ती सुस्पष्ट व्हावी यसाठी काही करता येऊ शकेल का? सुशिक्षितांना छोट्या छोट्या गोष्टीतला शहाणपणा यावा यासाठी आणखी एखादं विद्यापीठ सुरु करावे लागेल का? सुखी माणसं अस्वस्थतेचा सदरा का वापरताना दिसतात़ दिवसेंदिवस सुखाची साधनं वाढत आहेत पण माणसं आतून अशांत तंद्रीत वागताना दिसतात़.

साध्या साध्या गोष्टीत चुका करणं विसरणं, हरवणं एखादी गोष्ट केलीच आहे, याची खात्री नसणं वुई आरऐवजी आय येम लाभणं म्हणजे सुशिक्षितपणा का? जसं आहोत तसं दिसणं, राहणं म्हणजे शहाणपणा असताना आम्ही अस्वाभाविक जगण्याचा वेडेपणा का करत आहोत आम्ही? म्हणूनच म्हणावंसं वाटतं सुशिक्षितांना ...भक्ती, मुक्तीचं कारण ही परहिताय, स्वधर्म रक्षण हेच असावं. माझ्या आनंदाचं कारणच इतरांना आनंदी ठेवणं असायला हवं, पण आज माणसं स्वत:च्या दु:खाने कमी, पण इतरांच्या सुखाने जास्त त्रस्त आहेत आणि हा आजार व्हायरल इन्फेक्शनसारखं झपाट्याने वाढतो आहे म्हणून आम्हाला आता जे शिकलो ते वाचतो, ऐकतो आहोत त्यात जीव-जाणिवा व चैतन्य निर्माण करावं लागेल, तरच सारे नियम आम्हाला कळून ते वर्तनात उतरतील. या लेखाच्या वाचनाने एकातरी सुशिक्षिताचा एक तरी नियम जाणिवेचे पालन किमान एकदा तरी  केल्यास हा लेखन प्रपंच सार्थकी ठरला, असं मला वाटेल. -रवींद्र देशमुख ( लेखक हे निवृत्त शिक्षक व अभ्यासक आहेत )

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा