शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 13:05 IST

१२ शेतकºयांचे द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान : यलमार मंगेवाडीत शेळ्याचे शेड उडाले, छावण्यातील  शेडनेटही जमीनदोस्त

ठळक मुद्देदुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले

सांगोला : दुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना. रविवारी रात्री १० च्या सुमारास वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले असून, एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले आहेत. याच गावातील १२ शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे़ य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोठेही जीवितहानी झाली नाही; मात्र वादळी वारे व पावसामुळे छावण्यातील जनावरांच्या निवाºयासाठी उभारलेले शेडनेट उडून गेल्याने जनावरे व पशुपालकांचे हाल झाले. 

रविवारी तालुक्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून ९ मंडलनिहाय सरासरी ११़२२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली़ गेल्या पाच ते सहा महिन्यापासून भीषण दुष्काळी परिस्थिती व प्रचंड तापमानामुळे शहर व तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते़ कधी एकदा मान्सूनचा पाऊस पडतोय आणि उन्हाळ्यातून सुटका होते यासाठी सर्वांचे डोळे पावसाकडे लागून राहिले होते.

गेल्या दोन, चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असून वादळी वारे व मेघगर्जनेसह तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी दुपारी ४ नंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले होते. रात्री १० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागताच मेघगर्जनेसह मान्सून पावसाचे आगमन झाले. तासभर वादळी वाºयातच मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, वादळी वाºयात मेडशिंगी येथील ६ घरांचे, बुरलेवाडी २ घरावरील, आलेगाव येथील ४ घरांचे, सांगोल्यातील १३ घरांवरील, सोनलवाडी येथील २ घरांचे, वाणीचिंचाळे येथील तब्बल १७ घरांवरील, घेरडी-लोटेवाडी-अजनाळे-लिगाडेवाडी या गावातील प्रत्येकी ५ घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहेत.  य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड व वाणीचिंचाळे येथील १२ खातेदार शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.  आलेल्या पावसाने शेतकºयांमधून व्यक्त होत असताना नुकसानीने ते हतबल झाले ओहत.

भंडारकवठे परिसरात  पाणीच पाणीसोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, माळकवठे, निंबर्गी परिसरात रविवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे दोन तास पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

रविवारी दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळनंतर आभाळ भरून आले आणि रात्री नऊ वाजता पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दोन तास कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस कोसळत होता. या पावसाने रानात पाणीच पाणी झाले. खड्डे पाण्याने भरून गेले. काही भागात पावसामुळे पाणी असल्याचे दिसून आले. 

पंचनामा करण्याचे तहसीलदारांचे आदेश- तहसीलदार संजय पाटील यांनी तलाठ्यांना संबंधित गावात जाऊन पत्रे उडून गेलेल्या घरांचे व नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करुन अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांनी सोमवारी दिवसभर पंचनामे सुरु होते.- सांगोल्यात रविवारी रात्री मंडलनिहाय पावसाची आकडेवारी : सांगोला १५, हातीद ३, नाझरा १, महूद १८, संगेवाडी १७, सोनंद ११, जवळा २, कोळा ७, शिवणे २७ असा एकूण १०१ मि. मी़ पाऊस झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळ