शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 2:57 PM

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हणजे १२०.७१ टीएमसी पाणीसाठा होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी ...

ठळक मुद्दे१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होतापुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातीलपाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.

१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हणजे १२०.७१ टीएमसी पाणीसाठा होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस होऊनसुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला. ९ आॅक्टोबरला ११६.५२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे ९८.६८ टक्के इतका पाणीसाठा आहे. ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला. 

सध्या असणाºया अल्प पावसाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्वांनाच उजनीच्या पाण्यावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. पाणी वाटप योग्य तºहेने न झाल्यास शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याशिवाय अनेक गावांचा पाणीपुरवठाही याच उजनीवर अवलंबून असल्याने त्यांचाही विचार करावा लागणार आहे. पाच आॅक्टोबर रोजी जनहित संघटनेने भीमानगर येथे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांना कोंडून कुलूप लावले होते. अशा घटना येणाºया काळात घडू नयेत यासाठी प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे.

येणाºया काळात पाण्याचे राजकारण होणार असून, त्यासाठी धरण प्रशासनाने प्रत्येक उपसा सिंचन योजना किंवा कालवा यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करावे लागणार आहे. अन्यथा वर्षभरात त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका