शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पावसाच्या चार नक्षत्रांनी सोलापूर जिल्ह्याला दिली हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:39 IST

पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या;सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊसअळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती

सोलापूर : एकामागून एक पावसाळ्यातील चार नक्षत्रांचा पाऊस म्हणावा तसा पडला नसल्याने यावर्षीचाही खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या असल्या तरी पिके मात्र येण्याची शक्यता मावळली आहे. सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ३९ टक्के इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके आली नाहीत. शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. याशिवाय पाऊस पडला नसल्याने द्राक्ष, केळी, ऊस, डाळिंब व अन्य फळपिकांनाही फटका बसला आहे. उजनी धरण क्षेत्र, भीमा नदीकाठ तसेच अन्य जिल्ह्यातील धरणातील पाणी मिळालेला अल्पसा भाग वगळता अन्य ठिकाणी बागायती क्षेत्र पाहावयासही शिल्लक राहिले नाही. यावर्षी तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसु ही चारही नक्षत्रे काही गावांचा अपवाद सोडला तर कोरडीच गेली आहेत. काही मंडलांत पाऊस बºयापैकी पडल्याची नोंद पर्जन्यमापकांच्या आधारे झाली असली तरी ती एका गावासाठीच मर्यादित असल्याचे सांगितले जाते. मंडलातील एक-दोन गावांतच पाऊस पडतो व त्याची नोंद होते, असे शेतकरी सांगतात. 

सोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. काही मंडलांत तर ६ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. ५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊस आहे. त्यामुळे जनावरांसाठी गवत येण्यासारखाही पाऊस पडलेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बºयाच शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. काही शेतकºयांनी जनावरांसाठी मका पेरणी केली आहे. मात्र पाऊस नसल्याने उगवणही होणे कठीण आहे. उगवण झाली तर अळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती आहे. काही मंडलांत चांगला पाऊस पडला असला तरी सरासरी ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद मात्र झाली आहे. 

या मंडलांत पडला ७० मि.मी.पेक्षा कमी पाऊस - शेळगी, तिºहे, वळसंग, मुस्ती, विंचूर, खांडवी,वैराग, उपळे दुमाला, बानगाव, नारी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी, वाघोली, कामती बु., शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, मोडनिंब, लऊळ, सीना दारफळ, रोपळे क., टेंभुर्णी, म्हैसगाव, करमाळा, कोर्टी, केत्तूर, केम, जेऊर, उमरड, सालसे, अर्जुननगर, पंढरपूर, कासेगाव, तुंगत, पुळूज, चळे, करकंब, सांगोला, हातीद,नाझरा, संगेवाडी, शिवणे, माळशिरस, लवंग, सदाशिवनगर, इस्लामपूर, नातेपुते, अकलूज, दहिगाव,बोराळे, मरवडे, हुलजंती,भोसे, आंधळगाव,मारापूर आदी.

पडलेल्या पावसाच्या आधारे खरीप पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पेरणी करु लागले आहेत. मात्र पिकांना पोषक पाऊस पडत नाही. त्यामुळे खरीप पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे चांगला पाऊस पडला तर तूर व मका ही पिके येऊ शकतात.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती