शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर येथे ५५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:16 PM

लग्नकार्यातील खीर दुसºया दिवशी खाल्ली 

ठळक मुद्देविषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध, महिला, मुले यांचा समावेश लग्नातील भोजन आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेली खीर त्यांनी गावातील ग्रामस्थांना वाटलीवयोवृद्ध १६ रुग्णांना मात्र उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले

अक्कलकोट: लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर (ता. अक्कलकोट) येथील ५० ते ५५ जणांना विषबाधा झाली. या सर्वांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सलगर येथे दि. १७ डिसेंबर रोजी चंद्रकांत धडके यांच्या घरी लग्नकार्य होते. लग्नातील भोजन आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेली खीर त्यांनी गावातील ग्रामस्थांना वाटली. ही खीर त्यांनी दुसºया दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत खाल्ली. त्यानंतर सर्वांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला. तत्काळ सरपंच सुरेखा गुंडरगी, उपसरपंच राजकुमार जमादार, पोलीस पाटील बिराजदार यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालयात हलविले. वयोवृद्ध १६ रुग्णांना मात्र उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले. सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले.

विषबाधा झालेल्यांमध्ये शरदा धडके,कस्तुरबाई  धडके, जयश्री कोळी, नसीमा बिराजदार, भाग्यश्री कोळी, निगवव्वा संगोळीगी,अमिना लालखा, रामचंद्र कोळी, अभिमन्यू जोगदे, कमल होटकर,निलाबाई कोळी, जरीना मुजावर, शिलवंती कोळी, कस्तुरबाई हडलगी, तुकाबाई चिकमळळी, सावित्री भडोळे, अंबिका नरुणे, नागम्मा जनवडे, कालव्वा कोळी, लक्ष्मण कोळी, हलीम गुळळो, श्रीशैल म्हेत्रे, रुकमबी गुळळो, मल्लिनाथ कोळी, नागम्मा  कोळी, महानंदा कोळी, सावित्री कोळी, निलम्मा कोळी, शशिकांत कोळी, लक्ष्मीकांत कोळी, रामचंद्र कोळी असे ५० ते, ५५ रुग्ण बाधित आहेत.

रुग्णालयाची तारांबळ- अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता ३० इतकी आहे. मात्र अचानक ५५ रुग्ण दाखल झाल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध, महिला, मुले यांचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य