शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळी प्रस्तावात ‘बार्शी, उत्तर’चं चांगभलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:55 IST

तुळशीची टँकरसाठी मागणी : सत्यमापन अहवालानुसार पिकांचे ५० टक्के नुकसान

ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातून बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला वगळण्यात आले होतेजिल्ह्यातील नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सर्वच तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात घट

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई, चाराटंचाई जाणवते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नऊ तालुक्यांचा प्रस्ताव दुष्काळासाठी पाठविण्यात आला आहे. तर उत्तर व बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी १० टक्के गावांमध्ये केलेल्या सत्यमापन अहवालानुसार जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी ४० टक्क्यांपर्यंतच पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वच तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात घट झालेली आहे. 

जिल्ह्यातील नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर जिल्ह्याची पाणीपातळी २.२८ मीटरने खालावल्याचे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर ३०६ गावे, तसेच जानेवारी ते मार्च १६० गावे तर एप्रिल ते जून दरम्यान १४१ गावे असे एकूण ६६० गावात पाणीटंचाई जाणवणार आहे.

टँकरचा पहिला प्रस्तावमाढा तालुक्यातील तुळशी गावात टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. खासगी टँकरसाठी निविदा काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय २९ टँकर आहेत. तुळशी गावाची लोकसंख्या सहा हजार आहे. गावात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. पुरवठा करणाºया विहिरीला अत्यल्प पाणी आहे. तसेच वळसंग गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रशासनाकडे निवेदन आले आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यावर सवलती- शासनाने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांची फी माफ, वीजबिले माफ, सक्तीची वसुली होणार नाही. तहसीलदारांना टँकरचे अधिकार, अशा विविध प्रकारच्या सवलती मिळणार आहेत.

त्या दोन तालुक्यांचा अहवाल पाठविला- दुष्काळी तालुक्यातून बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला वगळण्यात आले होते. आता दोन तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. तसेच त्या दोन तालुक्यांत विशेष बाब म्हणून दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावर शासनस्तरावर निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीवर बुधवारी पुण्यात बैठक होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती