शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळी प्रस्तावात ‘बार्शी, उत्तर’चं चांगभलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:55 IST

तुळशीची टँकरसाठी मागणी : सत्यमापन अहवालानुसार पिकांचे ५० टक्के नुकसान

ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातून बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला वगळण्यात आले होतेजिल्ह्यातील नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सर्वच तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात घट

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई, चाराटंचाई जाणवते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नऊ तालुक्यांचा प्रस्ताव दुष्काळासाठी पाठविण्यात आला आहे. तर उत्तर व बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी १० टक्के गावांमध्ये केलेल्या सत्यमापन अहवालानुसार जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी ४० टक्क्यांपर्यंतच पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वच तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात घट झालेली आहे. 

जिल्ह्यातील नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर जिल्ह्याची पाणीपातळी २.२८ मीटरने खालावल्याचे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर ३०६ गावे, तसेच जानेवारी ते मार्च १६० गावे तर एप्रिल ते जून दरम्यान १४१ गावे असे एकूण ६६० गावात पाणीटंचाई जाणवणार आहे.

टँकरचा पहिला प्रस्तावमाढा तालुक्यातील तुळशी गावात टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. खासगी टँकरसाठी निविदा काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय २९ टँकर आहेत. तुळशी गावाची लोकसंख्या सहा हजार आहे. गावात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. पुरवठा करणाºया विहिरीला अत्यल्प पाणी आहे. तसेच वळसंग गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रशासनाकडे निवेदन आले आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यावर सवलती- शासनाने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांची फी माफ, वीजबिले माफ, सक्तीची वसुली होणार नाही. तहसीलदारांना टँकरचे अधिकार, अशा विविध प्रकारच्या सवलती मिळणार आहेत.

त्या दोन तालुक्यांचा अहवाल पाठविला- दुष्काळी तालुक्यातून बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला वगळण्यात आले होते. आता दोन तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. तसेच त्या दोन तालुक्यांत विशेष बाब म्हणून दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावर शासनस्तरावर निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीवर बुधवारी पुण्यात बैठक होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती