शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:54 PM

जागतिक हवामान दिन विशेष - सोलापूर जिल्ह्यात प्रभावी तंत्रज्ञानाची गरज

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची गरज

समीर इनामदार सोलापूर: अचानक येणारा पाऊस, होणारी गारपीट तसेच वातावरणातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भांबावला असून, होणाºया परिणामांचा वेध घेण्यासाठी  प्रभावी यंत्रणांची गरज निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा आहे. त्याशिवाय आॅक्टोबर ते डिसेंबर या काळातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो. मात्र आता कोणत्याही महिन्यात पाऊस पडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामानात बदल झाल्याने सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी विचित्र स्थितीही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात कोणते पीक घ्यावे किंवा या बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास आता करावा लागणार आहे.

राज्यात हवामान बदलाचा स्वतंत्र विभाग आहे. त्याशिवाय उपग्रह, संगणकाचा वापर करूनही शेतकºयांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत शेतकºयांनी कोणते वाण घ्यावे?, कोणत्याही वातावरणात टिकणारे बी-बियाणे संशोधित होत आहेत, त्याचीही माहिती मिळत नाही, ही अनेक शेतकºयांची खंत आहे.

२०३० पर्यंत सर्वसाधारणपणे ०.५ अंश इतके तापमान वाढेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात हवामान बदल होतो आहे किंवा नाही, याबाबत शास्त्रज्ञात दुमत आहे. काहींच्या मते ठराविक कालावधीनंतर असे बदल होत राहतात आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे, याचा बाऊ करण्याचे काही कारण नाही. सोलापूरचे तापमान ४५ अंशांपर्यंत जाणे हे १५० वर्षांपासून सुरूच आहे. अलीकडच्या काळातच केवळ तापमानात वाढ झाली आहे, हे म्हणणे देखील तितके खरे नाही.

जगभरात पृथ्वीचे तापमान, वातावरण, हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदी या १८५० पासून उपलब्ध आहेत. १९०६ ते २००५ या काळात तापमान ०.७४ अंशाने वाढले आहे. तर १९९६ ते २००८ या १२ वर्षांपैकी ११ वर्षे उष्ण तापमानाची म्हणून गणली गेली. २०१६ आणि २०१७ ही वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणूनही ओळखली जातात. हवामान बदलामुळे २०२० सालापर्यंत जगभरात २५ कोटी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. काही देशात कृषी  उत्पन्न वाढेल तर काही देशात ते  कमी होईल. गारपीट, दुष्काळ,  महापूर, विजा कोसळण्याचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सोलापूरचे नुकसान- २०११, २०१४, २०१६, २०१७ या वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दरवर्षी अशा नुकसानीमुळे शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. अवकाळी पावसाविषयी अगोदरच कल्पना आली तर हे नुकसान कमी होईल. शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची यानिमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमान