शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:47 IST

कोरोना संकटातही गूड न्यूज; रोज ५०० टन केळीची निर्यात, भाव मिळू लागला

ठळक मुद्देआंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जातेआंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली

नासीर कबीर  

करमाळा : केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली असून, करमाळा तालुक्यातील  दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर  येथे मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे.  यामुळे केळी बागायतदारांच्या चेहºयावर हसू फुुललं आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  बाजारपेठा बंद होत्या. ग्राहक नव्हते शिवाय जिल्हा बंदीची सक्त अंमलबजावणीमुळे केळीची पाठवणूक  रखडली होती. यामुळे दरात घसरण झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडला होता. २० एप्रिलपासून शेतीमालास लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्याने केळीची पाठवणूक सुरू झाली आहे. टेंभुर्णी, कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिकलठाण, वांगी  भागातून सध्या रोज ५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता)  म्हणजे दररोज ५००  टन केळीची उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर येथे पाठवली जात आहे. केळीचे दर मागील आठवड्यात ४ ते ५ रुपये किलो होते, परंतु आज २५ तारखेपासून रमजान सुरू झाल्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून, ७ ते ८ रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादकातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

आंध्रातला हंगाम संपला.. सोलापूर जिल्ह्याला संधीआंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. आंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली असल्याने त्यास मागणी आहे, अशी माहिती फलटणचे खरेदीदार सनी इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीAndhra Pradeshआंध्र प्रदेशfruitsफळे