शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चालू गाळप हंगामातील ३५४ कोटी शेतकऱ्यांचे देणे कारखानदारांनी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 13:02 IST

२८ साखर कारखाने सुरू : १५ कारखान्यांनी २२८ कोटी ऊस उत्पादकांना दिले

सोलापूर : जिल्ह्यातील ४० पैकी २८ साखर कारखान्याचे गाळप सुरू असून, १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ३५४ कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत. १५ साखर कारखान्यांनी २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ५९ लाख ७२ हजार २३१ मेट्रिक टन ऊस गाळपातून ५० लाख ९५ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. सरासरी साखर उतारा ७.८३ टक्के इतका पडला आहे. १५ डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपाचे एफआरपीनुसार ५८२ कोटी रुपये साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक होते. मात्र सुरू असलेल्या २८ पैकी १५ साखर कारखान्यांनी २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आली. एफआरपीनुसार ३५४ कोटी रुपये कारखानदारांनी थकवले आहेत. १५ डिसेंबरनंतरही काही साखर कारखान्यांनी ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे मात्र त्याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

पांडुरंगने पहिली उचल दिली

श्री पांडुरंग कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन २१०० रुपये पहिली उचल दिली आहे. विठ्ठलराव शिंदे, मकाई सहकारी, सासवड माळी शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, बबनराव शिंदे केवड, विठ्ठल रिफायनरी पांडे, विठ्ठलराव शिंदे करकंब व भीमा टाकळी सिकंदर या साखर कारखान्यांनी प्रतिटनाला दोन हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले आहेत. युटोपियन कारखान्याने १७०० रुपये, तर सिद्धनाथ कारखान्याने अनामत म्हणून काही रक्कम दिली असल्याचे सांगण्यात आले.

उताऱ्यात पांडुरंगची आघाडी

साखर उताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंग कारखाना आघाडीवर आहे. पांडुरंग साखर उतारा ९.७८ टक्के इतका आहे. त्यानंतर सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखाना ९.७५ टक्के, विठ्ठलराव शिंदे करकंब ९.५५ टक्के, बबनराव शिंदे ९.५१ टक्के, मातोश्री लक्ष्मी शुगर ९.२६ टक्के, सिद्धेश्वर कारखाना ९.१७ टक्के, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील ९.१६ टक्के, जयहिंद शुगर ९.०७ टक्के, भैरवनाथ लवंगी ९.०३ टक्के इतका साखर उतारा पडला आहे. २८ पैकी ९ साखर कारखान्यांचा साखर उतारा ९ टक्क्यांपेक्षा अधिक तर सर्वात कमी ५.०८ टक्के साखर उतारा जकराया साखर कारखान्याचा आहे.

जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने संपूर्ण एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. पहिली उचल दिली असून, एफआरपीनुसार उर्वरित रक्कम देणे बंधनकारक आहे.

- पांडुरंग साठे

उपसंचालक, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी