शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

बाप रे...११० किलो वजनाची सापडलेली मगर उजनीलगतच्या वनक्षेत्रातच सोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:01 IST

परिसरात भीतीचे वातावरण; कात्रज येथे मगर ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्याचे दिले कारण

ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलामहाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली

सोलापूर/ भिगवण : उजनी धरणात मगर आहे, अशा चर्चा मागील  दोन वर्षांपासून होत होत्या. चार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली आहे. तसेच ही मगर कोणत्या ठिकाणी सोडली, हे मात्र वनविभागाने सांगितले नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रानजीक असणाºया परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन-तीन वर्षांपासून होत आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर येथे मच्छीमारीच्या जाळीत मगर अडकली होती तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याची माहिती मिळत होती तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मच्छीमारांना मगरीने दर्शन दिले असल्याची माहिती मिळत आहे, असे असताना दोन दिवसांपूर्वी १२ फूट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, नितीन सल्ले, अशोक पतुले, रवींद्र नगरे या मच्छीमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते. तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते. 

मात्र वनविभागाने ही मगर धुमाळवाडी येथील उजनीशेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मच्छीमार धास्तावून गेल्याचे सांगण्यात येत  आहे. 

पर्यटकांसह शेतकºयांमध्ये पसरली भीती- या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे. मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे. उजनी धरणाच्या किनारी असणाºया वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून, जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले. तर वन्यजीव महत्त्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले. मात्र ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली, हे सांगता येणार नाही. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले होते. मात्र कात्रजला ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायद्यानुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली.- राहुल काळेवनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर 

वनविभागाने उजनी किनारी असणाºया वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. यातून मच्छीमारांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का? अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पन्न झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार आहेत. - नंदकुमार नगरे, महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीPuneपुणेkatrajकात्रज