शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप दारू पिऊन मारायचा म्हणून शिक्षण सोडले, काम करून घर चालवले !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:39 IST

ऑपरेशन मुस्कान : ६७४ मुले पालकांच्या स्वाधीन, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पलायन

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान गेल्या २५ दिवसात ६७५ मुलांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांना पालकांच्या ताब्यात

 संताजी शिंदे

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान उपक्रमांतर्गत गेल्या २५ दिवसात ६७५ मुलांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांना पालकांच्या ताब्यात  देण्यात आले आहे. यामध्ये बाप दारू पिऊन मारायचा म्हणून शिक्षण सोडले अन्‌ काम करून घर  चालवले, अशी कबुली एका मुलाने दिली. 

मुस्कान योजनेंतर्गत पकडण्यात आलेल्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. गरिबी, वाईट संगत, प्रेमप्रकरण  आदी कारणास्तव मुले घरातून निघून जातात. मिळेल ते काम करतात.  एक १४ वर्षांखालील मुलगा अंडा आम्लेटच्या गाडीवर काम करताना आढळून आला. लहान मुलाला कामावर ठेवल्याप्रकरणी मालकावर बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमन १९८६ प्रमाणे कारवाई करण्यात  आली आहे. अशा मुलांचा आणखी शोध सुरू आहे. 

घरासाठी शाळा सोडलीआई चार घरची  धुणीभांडी करते. वडील रात्री घरी दारू पिऊन येतो आणि आईला मारहाण करतो. आम्ही रडू लागलो की, आम्हालाही मारत होता. घरात खर्च करण्यासाठी पैसे देत नाही,  शिवाय आईलाच दारूसाठी पैसे मागतो. वडील दररोज दारू पिऊन मारत असल्याने कंटाळून ७वीतून शाळा सोडली अन्‌ हॉटेलमध्ये कामाला जात आहे. मिळालेल्या पगारावर घर चालवतो शिवाय आणखी दोन लहान  बहिणी व एक भाऊ आहे  अशी व्यथा एका मुलाने मांडली. 

शिक्षण आवडत नाहीआई-वडिलांनी शाळेत घातले होते,  मात्र तेथे मन रमत नाही. शिवाय शाळा शिकू वाटत नसल्याने मुलगा वर्गात बसत नव्हता. शिक्षक आई-वडिलांकडे तक्रार करू लागले. आई-वडिलांनी मारहाण केल्याने कंटाळून  मुलगा घरातून  निघून गेला. चायनीजच्या  गाडीवर काम करू लागला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार  दिली, त्याचा शोध घेतला आणि पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले. असा प्रकारही आढळून आला आहे. 

प्रेमामुळे घर सोडलेवय वर्ष अवघे १७. बालवयातच एका मुलाबरोबर प्रेम जडले. घरच्या लोकांच्या भीतीने दोघांनीही घरातून पळ काढला. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे दोघेही घरी येण्यास तयार नाहीत. गेलेली मुलगी अद्याप आली नाही म्हणून शेवटी आई-वडिलांनी नाद  सोडून  दिला. २०२० मध्ये एकूण १३ मुली घरातून निघून गेल्या आहेत. त्यापैकी १० मुलींचा शोध लागला आहे तर  अन्य ३ मुली या अद्याप आई-वडिलांच्या घरी आल्या नाहीत. 

हरवलेल्या मुलांच्या तक्रारी वेगळ्या आहेत.  तर मुस्कान योजनेत पकडण्यात आलेली मुले वेगळी आहेत. शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व्हे करून बालकामगार मुलांचा शोध घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत  आणखी १५० च्या आसपास मुले सापडतील . - बजरंग साळुंखे, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं