शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात ३० जून ते ३ जुलैपर्यंत संचारबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 6:45 PM

पोलीस अधीक्षक मनोज पाटील : रुग्णालय, मेडिकल सोडून सर्व बंद, वारकऱ्यांना बंदी

ठळक मुद्देआषाढी वारी निमित्त पंढरपुरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तपंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व सीमा पोलिसांनी केल्या बंद

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी ३० जून दुपारी २ ते ३ जुलै पहाटे पाचपर्यंत संचारबंदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

आषाढी एकादशीचा सोहळा निमित्त माहिती सांगण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या दरम्यान ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा अधिकारी संजय जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांत अधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोनी. दयानंद गावडे, पोनी. अरुण पवार उपस्थित होते.

आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपूर शहर व शहरालगतच्या व ८ गावांमध्ये ३ दिवस संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. परंतु शहरात रुग्णालय व मेडिकल चालू राहतील. त्याचबरोबर संचार बंदीचा कालावधी नागरिकांना भाजीपाला व दूध पोहोच करण्याचे काम नगरसेवक व कोविड वॉरियर्स करतील. यामुळे संचारबंदी चा कालावधीत पुरेल इतके किराणा मालाचे साहित्य नागरिकांनी भरून घ्यावे.  आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

३० जूनला पालख्या येतील... 

२ जुलैला माघारी परतील

३० जूनला संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये त्यांच्या - त्यांच्या मठांमध्ये प्रवेश करते. प्रत्येक पालखीसह दहा ते वीस लोक असतील. २ जुलै ला रात्री ८ वाजता  आलेल्या मार्गाने त्यांच्या त्यांच्या गावी माघारी परततील. १ जुलै रोजी पहाटे अडीच ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी