शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:52 AM

१५ हजार शेतकरी बाधीत: बार्शी, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर, माळशिरसचा समावेश

सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने  व माण आणि भीमेला पूर येऊन १५ हजार ३0२ शेतकºयांच्या ११ हजार २१ हेक्टरावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

 जिल्ह्यात दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी सहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने तलाव, नाले भरून वाहिले आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पीके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच जोडीला उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर व दक्षिण सोलापूर तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

नदीकाठची शेती मोठया प्रमाणावर वाहून गेली आहे. भीमेची पातळी अचानक वाढल्याने शेतातील वस्तीवर असणारी जनावरे, ट्रॅक्टर, पंप, पाईपलाईनबरोबरच डाळींब, केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसात कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याची प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. नुकसानीची माहिती अजूनही घेतली जात असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकारी माने यांनी स्पष्ट केले.  

१७२ गावांना बसला फटका

पाच तालुक्यातील १७२ गावांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. यामध्ये माळशिरसमध्ये ९, दक्षिण सोलापूर तालुक्यात २५, सांगोल्यात ११, मंगळवेढ्यात १७, पंढरपूरमध्ये ६३ तर बार्शीत ४७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरावर खरिपाच्या कांद्याची लागवड झाली होती. यातील ८१५ शेतकºयांच्या ४९0 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 

विमा कंपन्याचे सर्वेक्षण सुरू

अति पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. अद्यापही बºयाच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. बºयाच शेतांमध्ये तळी असल्याने पीकांपर्यंत पोहोचता येत नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात बांध, नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे शेतांना पाणी लागले आहे. यामुळे या शेतात रब्बीचा पेरा करणेही अवघड होणार आहे. 

असे झाले तालुकानिहाय नुकसान...

माळशिरस, बाजरी: ७२१ शेतकरी (हेक्टर:५८६), मका:२0७ (१३४), उस: ६३ (३९), डाळींब: ५३ (२६), द्राक्ष: ४९ (२५), एकूण: १0९३ (८१0).दक्षिण सोलापूर, तूर: १८७५ शेतकरी, ( हेक्टर: १३५९), मूग: १६९ (९0), उडिद: ६१0 (३८८), मका: ५४२ (३0७), सोयाबीन: ४४ (४२.८0), भुईमूग: ४५५ (२६९), बाजर: ७७ (४१), सूर्यफुल: २ (३), भाजीपाला: १४५ (८0), कांदा: ६६५ (३९१), पेरू: २(१), एकूण: ४५८६ (२९७१.८0).सांगोला, ढोबळी मिरची: २४ (१४), द्राक्ष: ४३ (२२), बाजरी: ९३ (६९), मका: १0५ (७३), डाळींब: ८३ (५४), एकूण: २४३ (१५९).मंगळवेढा, सूर्यफुल: ३१२ (२00), बाजरी: ५७ (४0), कांदा: ४३ (२५), इतर भाजीपाला: ११७ (८५),एकूण: ५२९ (३५0).पंढरपूर,उस: २४३५ (१८९९), डाळींब: १६५५ (११५३), द्राक्ष: १५९२ (१२१0), भाजीपाला: ५४७ (३११), चारापीके: ५00 (२९५), मका: ५१२ (३0९), एकूण: ७२४१ (५१७७). बार्शी, उडिद:२४ (१८), सोयाबीन: १४७९ (१४६२), कांदा: १0७ (७४)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस