शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:12 PM

वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीतविजय शुगरकडे जिल्हा बँकेची १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये थकबाकी

सोलापूर: विजय शुगरचा ताबा घेतल्यानंतर आता आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी बँकेची सध्या न्यायालयीन व प्रशासकीय लढाई सुरू आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे बँकेच्या शेतकºयांकडील वसुलीसाठी हातभार लागला आहे; मात्र मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली होत नसल्याने बँकेने मालमत्ता ताब्यात घेणे व त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरकडे जिल्हा बँकेची सुमारे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने बँकेने रितसर विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता बँक या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगरचा ताबा मिळावा यासाठी बँकेने उच्च न्यायालयात अपील केले आहे. आर्यन शुगरकडे जिल्हा बँकेचे २१९ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया कारखान्याची मालमत्ता विक्री करुनच पूर्ण होणार आहे.आदित्यराज शुगरवर ४५ कोटींचा बोजामाजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरकडे २५ कोटी ८९ लाख ७२ हजार रुपये मुद्दल व १९ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये व्याज असे ४५ कोटी १८ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे,  कर्जापोटीच जुळे सोलापुरातील गट नंबर ९/१ब, प्लॉट नंबर १२ क्षेत्र ३०४ चौरस मीटरचा ताबा घेतला आहे. चार कारखान्यांकडे ५६६ कोटी थकले !

  • - आर्यन शुगरकडे मुद्दल १३१ कोटी ५ लाख ९ हजार व व्याज ८८ कोटी ३६ हजार २०६ रुपये अशी २१९ कोटी ४१ लाख २९ हजार थकबाकी आहे.
  • - विजय शुगरकडे ११३ कोटी ६० लाख ७५ हजार तर व्याज ६५ कोटी ५४ लाख रुपये असे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये येणेबाकी आहे. 
  • - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे ५८ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपये मुद्दल व २९ कोटी २९ लाख ३० हजार रुपये व्याज अशी ८७ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
  • - सांगोला साखर कारखान्याकडे ३७ कोटी १२ लाख ९३ हजार रुपये मुद्दल व ४२ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये व्याज अशी एकूण ८० कोटी ९ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. 
  • - विजय, आर्यन, स्वामी समर्थ व सांगोला या चार कारखान्यांकडे ५६६ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपये थकले आहेत. 

शेतकºयांना पीक असेल त्याप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँकेला पैशाची गरज आहे. मोठ्या सर्वच थकबाकीदारांकडील वसुलीसाठी बँकेचा प्रयत्न आहे. वसुली आल्यानंतर शेतकºयांनाच प्राधान्याने कर्ज दिले जाणार आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक