शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस म्हणते, हा तर सुशीलकुमारांचाच प्रकल्प; शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उड्डाण पुलावरुन दोन गट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 11:57 IST

कशी फुटणार कोंडी : कोठेंनी यापूर्वी विरोध नोंदवला, कधी मिळणार निधी

ठळक मुद्देउड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केलाशहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का?

राकेश कदम 

सोलापूर : शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. मूठभर लोकांच्या मिळकती बाधित होतील म्हणून त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे भाजपचे नेते बोलत आहेत. हा तर सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकल्प होता. पण आता त्याला प्राधान्य नको, असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. शिवसेनेत या विषयावरुन दुफळी आहे. राष्ट्रवादी पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आवश्यक निधी कसा मिळणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. 

उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे भविष्यात भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळेल की नाही, याची चर्चा सुरू आहे. उड्डाण पुलाच्या कामात अनेक आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकती बाधित होणार आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचाही समावेश आहे. दोन देशमुखांनी पुढाकार घेतल्याने भाजपचे नगरसेवक यावर फार बोलायला तयार नाहीत. शिवसेनेत मतभेद दिसत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मनपातील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महापालिकेच्या सभेत उड्डाण पुलास विरोध केला आहे. सेनेचे इतर नगरसेवक मात्र उड्डाण पुलाच्या बाजूने आहेत. या गोंधळात शहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का? पोहोचली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेते त्याला साथ देतील का?, अशीही चर्चा आहे. 

ठोंगे-पाटील, वानकर म्हणाले, आम्ही पाठपुरावा करू - शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. साखर कारखाने, सिमेंट कारखाने, मेडिकल हब यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढत राहील. आज केंद्र सरकारने पैसे दिलेत. उद्या किंमत वाढल्यास मिळतील की नाही याची शाश्वती नाही. मग कशाला विरोध करायचा. आमच्यातील काही लोक शहर विकासाऐवजी नातेवाईकांच्या हिताला प्राधान्य देतात. नातेवाईकांच्या जमिनी जातील म्हणून काही लोक विरोध करीत आहेत. हे बरोबर नाही. - लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना. 

 उड्डाण पुलाचे भूसंपादन सुरू झाले. ते कशाला थांबवायचे. प्रथम बाह्यवळण रस्ते व्हायला हवेत. त्यासोबत उड्डाण पुलाचे काम थांबू नये. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊ. गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसroad transportरस्ते वाहतूक