शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

काँग्रेस म्हणते, हा तर सुशीलकुमारांचाच प्रकल्प; शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उड्डाण पुलावरुन दोन गट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 11:57 IST

कशी फुटणार कोंडी : कोठेंनी यापूर्वी विरोध नोंदवला, कधी मिळणार निधी

ठळक मुद्देउड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केलाशहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का?

राकेश कदम 

सोलापूर : शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. मूठभर लोकांच्या मिळकती बाधित होतील म्हणून त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे भाजपचे नेते बोलत आहेत. हा तर सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकल्प होता. पण आता त्याला प्राधान्य नको, असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. शिवसेनेत या विषयावरुन दुफळी आहे. राष्ट्रवादी पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आवश्यक निधी कसा मिळणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. 

उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे भविष्यात भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळेल की नाही, याची चर्चा सुरू आहे. उड्डाण पुलाच्या कामात अनेक आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकती बाधित होणार आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचाही समावेश आहे. दोन देशमुखांनी पुढाकार घेतल्याने भाजपचे नगरसेवक यावर फार बोलायला तयार नाहीत. शिवसेनेत मतभेद दिसत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मनपातील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महापालिकेच्या सभेत उड्डाण पुलास विरोध केला आहे. सेनेचे इतर नगरसेवक मात्र उड्डाण पुलाच्या बाजूने आहेत. या गोंधळात शहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का? पोहोचली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेते त्याला साथ देतील का?, अशीही चर्चा आहे. 

ठोंगे-पाटील, वानकर म्हणाले, आम्ही पाठपुरावा करू - शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. साखर कारखाने, सिमेंट कारखाने, मेडिकल हब यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढत राहील. आज केंद्र सरकारने पैसे दिलेत. उद्या किंमत वाढल्यास मिळतील की नाही याची शाश्वती नाही. मग कशाला विरोध करायचा. आमच्यातील काही लोक शहर विकासाऐवजी नातेवाईकांच्या हिताला प्राधान्य देतात. नातेवाईकांच्या जमिनी जातील म्हणून काही लोक विरोध करीत आहेत. हे बरोबर नाही. - लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना. 

 उड्डाण पुलाचे भूसंपादन सुरू झाले. ते कशाला थांबवायचे. प्रथम बाह्यवळण रस्ते व्हायला हवेत. त्यासोबत उड्डाण पुलाचे काम थांबू नये. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊ. गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसroad transportरस्ते वाहतूक