शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी जनसंघर्ष यात्रेतील नेत्यांचे विठ्ठलाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:54 IST

सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातले.

सोलापूर : राज्यातील भाजपा सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार भारत भालके, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक काँग्रेसचे आजी माजी आमदार, खासदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राज्यात सातत्याने पेट्रोल डिझेलची दरवाढ होत आहे याबाबत अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारची संवेदनशीलता संपलेली आहे. भाजपा सरकार सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे संतापलेला असताना भाजपा सरकार याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. भाजपा सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी व ते सोडवण्यासाठी वेळ नसल्याचाही टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. काँग्रेसची संघर्ष यात्रा पंढरपुरात दाखल झाली असून सकाळी यात्रेतील प्रमुख नेत्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी भेट दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसSolapurसोलापूरAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण