शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

बंदिस्त तरी बिनभिंतीची आगळी शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:54 IST

मागच्या वेळी आपण नेरुर- माड्याचीवाडीची (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) ची माध्यमिक शाळा! तिथले अभिनव उपक्रम अनुभवले.  चला, आता दुसºया ...

मागच्या वेळी आपण नेरुर- माड्याचीवाडीची (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) ची माध्यमिक शाळा! तिथले अभिनव उपक्रम अनुभवले.  चला, आता दुसºया शाळेत जाऊ... ही शाळा याच कुडाळ तालुक्यातली. बिंबवणे गावातली. लक्ष्मीनारायण विद्यालय, सावंतवाडी-गोवा महामार्गालगत. जुनी कौलारू इमारत.

सततच्या पावसाने शेवाळलेल्या भिंती अन् फरशा. छोटंसं मैदान. व्हॉलिबॉलचं मैदान आणि जाळी सांगत होती इथल्या मुलांचं कौतुक! ‘सीएम’चषक पटकावण्यापर्यंत मुलं पोहोचली! ही मुलं मैदानावर जेवढी खेळतात ना तेवढीच शाळेच्या गॅदरिंगला पारंपरिक दशावतार सादर करण्यातही रमतात. इथल्या मुलांचा परिपाठ हा एक संगीतमय सोहळा असतो. 

शाळा संपण्याच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. मोठ्या जुन्या सभागृहात सगळी मुलं शिस्तीत बसलेली. दोन तबलजी, एक हार्मोनियम, एक सिंथेसायझर, एक साईड रिदम, दोन साऊंड आॅपरेटर! हे कुणी कुणी सरावलेले कलाकार नव्हते. ही वेगवेगळ्या वर्गातली मुलं होती. कुणी नववी, कुणी दहावी, कुणी पाचवी तर कुणी सातवी! सिंथेसायझर वाजवणाºया मुलाने हलकीशी खूण केली अन् एका ताला-सुरात प्रार्थना घुमू लागली... ‘तू बुद्धी, तू तेज दे..’, दुसरी प्रार्थना...‘ हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’... समोरच्या दीडशे मुलांचा एकच स्वर. एक लय. एकच शब्द. मणका ताठ, मान सरळ, हात जोडलेले, डोळे मिटलेले, चेहरे सौम्य आणि प्रसन्नही..! 

प्रार्थना संपली. मुलांचे डोळे मिटलेलेच. प्रार्थनेचे तरंग वातावरणात, ऐकणाºयाच्या मनात रुजत जातात. ती शांतता अशीच काही काळ माझ्या मनात झिरपत गेली. खरं सांगू? या मुलांनी प्रार्थना मुखाने म्हटलीच नाही... हृदयानेच प्रार्थना जणू कोरली होती. अंतरीचा स्वर घेऊन ते म्हणत होते. शब्दात आर्तता होती, स्वरात सहजता होती. काहीकाळ ती प्रार्थना ते जगतच होते आणि मलाही त्यात सामील करून घेतलं होतं! त्या मुला-मुलींचे सौम्य, शांत,प्रसन्न आणि निश्चयी चेहरे  असेच कायम राहोत!

विशेष म्हणजे या शाळेत कोणी संगीत मास्टर नाही. प्रत्येक वर्गाची भजन स्पर्धा घेतात. अट एकच. तबला पेटी वाजवणारेही त्याच वर्गातली मुलं असावीत. मग काय, मुलं धडपडून शिकतात. त्यातले जरा तरबेज वादक संपूर्ण शाळेसाठी वाजवतात. यामुळं होतं काय की, वाजवणारा, होतकरू विद्यार्थी शाळेतून बाहेर पडला तरी संगीत विभाग बंद पडत नाही. त्याची जागा दुसरा कोणी भरून काढतो. हे अनेक वर्षे छान चालू आहे..

दोन शाळा. दोन गावं. एकाच तालुक्यातल्या वेगळ्या संस्था. पण काही गोष्टी समान होत्या. शिक्षकांची अफाट जिद्द, कल्पकता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आस. हाताशी जी आणि जेवढी साधनं आहेत त्याच्या आधारावर पुढे जाण्याची इच्छाशक्ती. रडत बसणे नाही. तिथल्या एका शिक्षकाने खूप छान सांगितलं. ते म्हणाले, ‘समस्येमध्येच उत्तर दडलेलं असतं. ते बाहेर नसतंच!ह्ण वाक्य छोटं होतं पण मोलाचं होतं. वर्गापेक्षा वर्गाबाहेर, उघड्या आकाशाखाली मुलं जास्त शिकतात, बिन भिंतीची शाळा अधिक जिवंत अनुभव देते, हेच    खरं!

या दोन्ही शाळांच्या भेटीने मला आनंद तरी दिलाच पण खूप शिकवलंही. या शाळा भेटीचा योग्य जुळवून आणला तो डॉ. प्रसाद देवधर या माझ्या मित्राने...त्याच्या बद्दलही लिहायला हवंच...पण फुरसतीने!!- माधव देशपांडे (लेखक उद्योग क्षेत्रात व्यवस्थापक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा