शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:14 IST

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ...

ठळक मुद्देमहसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा - मुख्यमंत्रीजिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच तळ ठोकून रहावे असा फतवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जारी केला आहे. 

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ८२ लाख शेतकºयांपर्यंत मदत पोहोचवायची आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील अभियंते, कृषी अधिकाºयांना बैठकांसाठी मुंबईला आमंत्रित करू नये. जिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात. अशा बैठका पालकमंत्री व संबंधीत विभागाच्या मंत्र्यांनीच बैठका विभाग किंवा जिल्ह्यातच घ्याव्यात. इतर मंत्र्यांनी मंत्रालय किंवा विभागीय स्तरावरील बैठकांना अधिकाºयांना बोलावू नये.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बहुतांश वेळा मंत्रालय स्तरावरून आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त राहिल्याने इतर कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून आयोजित करण्यात येणाºया व्हिडीओ कॉन्फरन्स महिन्याच्या दुसºया व चौथ्या गुरुवारी व मंत्र्यांनी आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी घेण्यात याव्यात अशा सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.

महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. हे परिपत्रक सर्व मंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीने पाठविण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिपत्रक मिळाले आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीला मी जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नांसाठी दौरे घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळीकामांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMantralayaमंत्रालयministerमंत्रीdroughtदुष्काळ