शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:14 IST

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ...

ठळक मुद्देमहसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा - मुख्यमंत्रीजिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच तळ ठोकून रहावे असा फतवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जारी केला आहे. 

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ८२ लाख शेतकºयांपर्यंत मदत पोहोचवायची आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील अभियंते, कृषी अधिकाºयांना बैठकांसाठी मुंबईला आमंत्रित करू नये. जिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात. अशा बैठका पालकमंत्री व संबंधीत विभागाच्या मंत्र्यांनीच बैठका विभाग किंवा जिल्ह्यातच घ्याव्यात. इतर मंत्र्यांनी मंत्रालय किंवा विभागीय स्तरावरील बैठकांना अधिकाºयांना बोलावू नये.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बहुतांश वेळा मंत्रालय स्तरावरून आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त राहिल्याने इतर कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून आयोजित करण्यात येणाºया व्हिडीओ कॉन्फरन्स महिन्याच्या दुसºया व चौथ्या गुरुवारी व मंत्र्यांनी आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी घेण्यात याव्यात अशा सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.

महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. हे परिपत्रक सर्व मंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीने पाठविण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिपत्रक मिळाले आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीला मी जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नांसाठी दौरे घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळीकामांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMantralayaमंत्रालयministerमंत्रीdroughtदुष्काळ