शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:14 IST

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ...

ठळक मुद्देमहसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा - मुख्यमंत्रीजिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच तळ ठोकून रहावे असा फतवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जारी केला आहे. 

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ८२ लाख शेतकºयांपर्यंत मदत पोहोचवायची आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील अभियंते, कृषी अधिकाºयांना बैठकांसाठी मुंबईला आमंत्रित करू नये. जिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात. अशा बैठका पालकमंत्री व संबंधीत विभागाच्या मंत्र्यांनीच बैठका विभाग किंवा जिल्ह्यातच घ्याव्यात. इतर मंत्र्यांनी मंत्रालय किंवा विभागीय स्तरावरील बैठकांना अधिकाºयांना बोलावू नये.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बहुतांश वेळा मंत्रालय स्तरावरून आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त राहिल्याने इतर कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून आयोजित करण्यात येणाºया व्हिडीओ कॉन्फरन्स महिन्याच्या दुसºया व चौथ्या गुरुवारी व मंत्र्यांनी आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी घेण्यात याव्यात अशा सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.

महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. हे परिपत्रक सर्व मंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीने पाठविण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिपत्रक मिळाले आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीला मी जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नांसाठी दौरे घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळीकामांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMantralayaमंत्रालयministerमंत्रीdroughtदुष्काळ