शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, दुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना 'असा' आधार दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:55 PM

राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील

सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्दाचे पक्के आहेत, असे राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जाते. मात्र, बार्शीकरांना याचा प्रत्यय आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत 250 महसूल मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीकरांना दिलेला शब्द पाळला आहे. 

राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, या दोन्ही यादीतून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला वगळण्यात आले होते. त्यामुळे बार्शीकर नाराज झाले होते, तसेच दुष्काळ यादीत बार्शीचा समावेश व्हावा यासाठी बार्शीकरांकडून आंदोलन अन् निवेदनही देण्यात येत होते. पण, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणखी 250 महसूल मंडलाचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. ज्या मंडलात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला, त्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या बार्शी आणि उत्तर सोलापूरला स्थान मिळाले आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 मंडलांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळल्यामुळे 'निसर्गानं झोडपलं पण राजानं तारलं' असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1, ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही. दरम्यान, बुधवारी बार्शी शहर वगळता, तालुक्यातील 9 मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळDilip Sopalदिलीप सोपलSolapurसोलापूर