शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:32 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक ...

ठळक मुद्देपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पणजवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक मानसिकता बदलत आहे. ती या धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 

येथील जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद घेण्यात आली. या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक सर्फराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कॉम्र्रेड रवींद्र मोकाशी होते. 

आव्हाड यांनी सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पण केली.  काश्मिर देशातील राजकारणाचा भाग झाला आहे. मोदी सरकारने काश्मिरी युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट या भागात सामाजिक अस्वस्थता वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

काश्मिर वाचविण्यासाठी जे जे करता येईल ते करायला हवे. नरेंद्र मोदी इस्राईलला गेले. मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या लहान मुलाला भेटले. पण उत्तर प्रदेशातील अखलाक किंवा पोलीस निरीक्षक सुबोधसिंग याच्या मुलाला भेटले नाहीत. सोलापुरातील मोहसीन शेखच्या कुटुंबीयांना भेटायला आले नाहीत. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. 

तर मीही अर्बन नक्षलवादी...- आव्हाड म्हणाले, अत्यंत क्रूर पद्धतीने शासन व्यवस्था चालविली जात आहे. अर्बन नक्षलवादी म्हणून आंबेडकरी चळवळीला बदनाम केले जात आहे. येथील वर्णव्यवस्थेत पिचलेल्यांच्या बाजूने बोलणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अर्बन नक्षलवादी म्हणून घ्यायला काहीही वाटणार नाही. ही बदनामी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNCPराष्ट्रवादी काँग्रेस