शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:32 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक ...

ठळक मुद्देपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पणजवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक मानसिकता बदलत आहे. ती या धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 

येथील जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद घेण्यात आली. या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक सर्फराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कॉम्र्रेड रवींद्र मोकाशी होते. 

आव्हाड यांनी सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पण केली.  काश्मिर देशातील राजकारणाचा भाग झाला आहे. मोदी सरकारने काश्मिरी युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट या भागात सामाजिक अस्वस्थता वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

काश्मिर वाचविण्यासाठी जे जे करता येईल ते करायला हवे. नरेंद्र मोदी इस्राईलला गेले. मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या लहान मुलाला भेटले. पण उत्तर प्रदेशातील अखलाक किंवा पोलीस निरीक्षक सुबोधसिंग याच्या मुलाला भेटले नाहीत. सोलापुरातील मोहसीन शेखच्या कुटुंबीयांना भेटायला आले नाहीत. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. 

तर मीही अर्बन नक्षलवादी...- आव्हाड म्हणाले, अत्यंत क्रूर पद्धतीने शासन व्यवस्था चालविली जात आहे. अर्बन नक्षलवादी म्हणून आंबेडकरी चळवळीला बदनाम केले जात आहे. येथील वर्णव्यवस्थेत पिचलेल्यांच्या बाजूने बोलणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अर्बन नक्षलवादी म्हणून घ्यायला काहीही वाटणार नाही. ही बदनामी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNCPराष्ट्रवादी काँग्रेस