शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ कारभारासाठी सोलापूर बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक -  सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:29 IST

सोलापूर बाजार समितीच्या धर्तीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक

ठळक मुद्देभाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकबाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणारचांगले संचालक निवडून येणे आवश्यक - देशमुख

सोलापूर : स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक असून, लोकमंगल परिवारातील कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, शिवाय उमेदवार लादणारही नाही, कार्यकर्त्यांनी निवडलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे मी उभा राहीन, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवर भाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर बाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणार असून चांगले संचालक निवडून येणे आवश्यक असल्याचे सहकारमंत्री देशमुख म्हणाले.

आजवर ठराविक कार्यकर्त्यांच्या पै-पाहुण्यांच्या जीवावर संचालक होऊन मर्यादित लोकांसाठी कारभार करणाºयांचे दिवस आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याने संपले असल्याचे सहकारमंत्री म्हणाले. बाजार समिती ही शेतकºयांना न्याय देण्यासाठीचे ठिकाण असल्यानेच शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. डॉ. चनगोंडा हविनाळे  यांनी आतापर्यंत शेतकºयांना  व्यापाºयांनी लुटले असून  दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध दिशेला तोंडे असलेले नेते सत्तेसाठी एकत्र आल्याचा आरोप केला. सत्तेसाठी एकत्र आलेले नेते खासगीत काय बोलतात हे सर्वांना माहीत आहे, अशांवर दक्षिणचे शेतकरी विश्वास ठेवणार नाहीत असे डॉ. हविनाळे म्हणाले.

आतापर्यंत सुभाष बापूंनी उमेदवारी कोणाला द्यावी हे कधी सांगितले नाही, आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच उमेदवारी देतो, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही निवडलेल्या उमेदवाराचा बापूंनी प्रचार केला होता, असे भाजपाचे उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी सांगितले. आतापर्यंत मोजक्या मताच्या जीवावर संचालक होणाºयांना आता शेतकºयांच्या पाया पडावे लागणार आहे, दक्षिण व उत्तरचे शेतकरी नक्कीच परिवर्तन करतील व चांगले संचालक निवडून देतील असे पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर म्हणाले. दक्षिणचे अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी कार्यकर्त्यांनी त्यागाची भूमिका ठेवावी, कोणीही उमेदवार असला तरी विजयासाठी परिश्रम घ्यावे असे यावेळी बोलताना सांगितले.

पंचायत समिती सदस्य एम.डी. कमळे यांचेही यावेळी भाषण झाले. बैठकीला जि.प. सदस्य आण्णाप्पा बाराचारे, शिरीष पाटील, हणमंत कुलकर्णी, सिद्धाराम हेले, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, केदार विभुते, धर्मा राठोड, संभाजी भडकुंबे, संजय भोसले, सुनील गुंड, सतीश लामकाने, नंदू पवार, ज्ञानू बंडगर, अमोल घोडके, विजय स्वामी, राम गुंड, संभाजी दडे, वसंत साखरे, इनायतअली जहागीरदार, प्रभाकर फुलसागर, संजय इनामदार, नितीन गरड, घनशाम गरड, शिवाजी पाटील, शिवाजी घोडके, सुरेश व्हनमोटे, विनायक सुतार, सुहास भोसले, मोहन काळे, पिंटू जाधव, विनोद पवार, सचिन भिंगारे, संदीप सुरवसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचा विचार- आमच्या संस्थेत कामाला आहे म्हणून उमेदवारी, ऐकण्यात असेल तरच उमेदवारी, असे आमच्याकडे होत नाही. गावच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देतो, असे भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम म्हणाले, परंतु दिलेला उमेदवार बापू आहे असे समजूनच कार्यकर्त्यांनी काम करावे असे कदम म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा