शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

स्वच्छ कारभारासाठी सोलापूर बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक -  सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:29 IST

सोलापूर बाजार समितीच्या धर्तीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक

ठळक मुद्देभाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकबाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणारचांगले संचालक निवडून येणे आवश्यक - देशमुख

सोलापूर : स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक असून, लोकमंगल परिवारातील कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, शिवाय उमेदवार लादणारही नाही, कार्यकर्त्यांनी निवडलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे मी उभा राहीन, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवर भाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर बाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणार असून चांगले संचालक निवडून येणे आवश्यक असल्याचे सहकारमंत्री देशमुख म्हणाले.

आजवर ठराविक कार्यकर्त्यांच्या पै-पाहुण्यांच्या जीवावर संचालक होऊन मर्यादित लोकांसाठी कारभार करणाºयांचे दिवस आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याने संपले असल्याचे सहकारमंत्री म्हणाले. बाजार समिती ही शेतकºयांना न्याय देण्यासाठीचे ठिकाण असल्यानेच शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. डॉ. चनगोंडा हविनाळे  यांनी आतापर्यंत शेतकºयांना  व्यापाºयांनी लुटले असून  दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध दिशेला तोंडे असलेले नेते सत्तेसाठी एकत्र आल्याचा आरोप केला. सत्तेसाठी एकत्र आलेले नेते खासगीत काय बोलतात हे सर्वांना माहीत आहे, अशांवर दक्षिणचे शेतकरी विश्वास ठेवणार नाहीत असे डॉ. हविनाळे म्हणाले.

आतापर्यंत सुभाष बापूंनी उमेदवारी कोणाला द्यावी हे कधी सांगितले नाही, आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच उमेदवारी देतो, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही निवडलेल्या उमेदवाराचा बापूंनी प्रचार केला होता, असे भाजपाचे उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी सांगितले. आतापर्यंत मोजक्या मताच्या जीवावर संचालक होणाºयांना आता शेतकºयांच्या पाया पडावे लागणार आहे, दक्षिण व उत्तरचे शेतकरी नक्कीच परिवर्तन करतील व चांगले संचालक निवडून देतील असे पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर म्हणाले. दक्षिणचे अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी कार्यकर्त्यांनी त्यागाची भूमिका ठेवावी, कोणीही उमेदवार असला तरी विजयासाठी परिश्रम घ्यावे असे यावेळी बोलताना सांगितले.

पंचायत समिती सदस्य एम.डी. कमळे यांचेही यावेळी भाषण झाले. बैठकीला जि.प. सदस्य आण्णाप्पा बाराचारे, शिरीष पाटील, हणमंत कुलकर्णी, सिद्धाराम हेले, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, केदार विभुते, धर्मा राठोड, संभाजी भडकुंबे, संजय भोसले, सुनील गुंड, सतीश लामकाने, नंदू पवार, ज्ञानू बंडगर, अमोल घोडके, विजय स्वामी, राम गुंड, संभाजी दडे, वसंत साखरे, इनायतअली जहागीरदार, प्रभाकर फुलसागर, संजय इनामदार, नितीन गरड, घनशाम गरड, शिवाजी पाटील, शिवाजी घोडके, सुरेश व्हनमोटे, विनायक सुतार, सुहास भोसले, मोहन काळे, पिंटू जाधव, विनोद पवार, सचिन भिंगारे, संदीप सुरवसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचा विचार- आमच्या संस्थेत कामाला आहे म्हणून उमेदवारी, ऐकण्यात असेल तरच उमेदवारी, असे आमच्याकडे होत नाही. गावच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देतो, असे भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम म्हणाले, परंतु दिलेला उमेदवार बापू आहे असे समजूनच कार्यकर्त्यांनी काम करावे असे कदम म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा