शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:16 IST

प्रत्येकाने आतापासूनच संभाव्य परिस्थिती ओळखून कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे.

ठळक मुद्देकोरोनांनंतरचे जग सर्वांगाने बदललेले असेल, पूर्वीसारखं सामान्य जनजीवन शक्य नाहीएका नव्या आरोग्य संकटाची सुरुवात होईल.. ज्यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाºयांना क्षमा नाही कोरोनासह जगा किंवा रोगराईला सामोरे जा, असेच थेट पर्याय असतील. कुठलेही भेद न जाणणारा कोरोना विषाणू थैमान घालेल

‘कोविड-१९’चा आजार तुमच्या माझ्या आयुष्यात येऊन दोन-अडीच महिने उलटले तरीही आपण कोरोना विषाणूला नीट समजून घेतलेले नाही हे आपल्या जगण्या-वागण्यातून स्पष्ट दिसतेय. आपल्या चुकांमुळेच कोरोना शेफारलाय. या विषाणूला स्वप्रयत्नाने तुमच्या आमच्या शरीरात प्रवेश करता येत नाही.आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाळल्या तर कोरोनाला लांब ठेवणे शक्य आहे. म्हणून हा आजार आणि विषाणू नेमका कसा आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. या आजाराचे विषाणू दोन प्रकाराने पसरतात. पहिल्या प्रकारात बाधित रुग्णाच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. या अतिशय छोट्या तुषारामध्ये देखील अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येने असतात. जे आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या श्वासातून श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. संसर्गाचा दुसरा प्रकार म्हणजे बाधित रुग्णाच्या खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना निरोगी व्यक्तीने हाताने स्पर्श केला आणि तोच हात स्वत:च्या चेहºयाला, नाकाला, तोंडाला, लावला तर त्यातून व्यक्तीला संसर्ग होतो. जगभर थैमान घालणाºया कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून साबणाने हात धुवा, असा साधा उपाय सांगितला आहे. हात कसे धुवावेत त्याविषयी देखील शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली. ‘सोशल डिस्टन्स’ आणि साबणाने हात धुणे यासारख्या परवडणाºया सोप्या उपायांतून संसर्ग रोखता येऊ शकतो. परंतु सहज शक्य गोष्टींचा आपण कंटाळा करतो आणि छोट्याशा दुर्लक्षामुळे संसर्ग होतो. सहज सोपा परंतु थोडासा कंटाळवाणा वाटणाºया या गोष्टी केल्याशिवाय कोरोनावरील लस आणि औषध तयार होईपर्यंत दुसरा पर्याय नाही.

सोलापुरातील सद्यस्थिती खूपच चिंताजनक आहे. हॉटस्पॉट म्हणून शहराची ओळख निर्माण झाली. वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे रेड झोन म्हणून शहर बदनाम होतेय. इथल्या कष्टकरी, गरीब झोपडपट्टीतल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. प्यायला पाणी नाही तर दिवसभर साबणाने धुवायला पाणी कोठून आणणार. सर्दी, खोकला यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसली तरी औषधोपचार घेऊ शकत नाहीत. म्हणून बाधितांची संख्या रोज वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटचा टप्पा संपायला आला. लवकरच परिस्थिती पूर्ववत करावी लागेल, तेव्हा शहरातील जनजीवन कसे असेल याची भीती वाटते. म्हणून प्रत्येकाने आतापासूनच संभाव्य परिस्थिती ओळखून कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे.

कोरोनांनंतरचे जग सर्वांगाने बदललेले असेल. पूर्वीसारखं सामान्य जनजीवन शक्य नाही. एका नव्या आरोग्य संकटाची सुरुवात होईल.. ज्यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाºयांना क्षमा नाही. कोरोनासह जगा किंवा रोगराईला सामोरे जा, असेच थेट पर्याय असतील. कुठलेही भेद न जाणणारा कोरोना विषाणू थैमान घालेल. हळूहळू सगळ्या गोष्टी शासनाच्या ताब्यात जातील. स्वघोषित सत्ताकेंद्रे संपुष्टात येतील आणि त्यावर बढाया मारणारी तरुणाई उघड्यावर येईल. सामाजिक विषमता वाढेल. जनसामान्यांची क्रयशक्ती कमी होईल. आर्थिक परिस्थिती वाईट होईल. मनोरुग्णांची संख्या वाढेल आणि आत्महत्या वाढतील. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे लागेल. म्हणून सोलापूरकरांनी अधिक जबाबदारीने आजच्या संकटाचा मुकाबला करायला तयार व्हावे लागेल. बदल स्वीकारावे लागतील. तरच येत्या केवळ दहा वर्षांनी म्हणजे २०३० मध्ये येऊ घातलेल्या ‘क्लायमेट ३०’सारख्या कोरोनापेक्षा अधिक गंभीर समस्येला सामोरे जाता येईल.- प्रा. विलास बेत(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस