शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:16 IST

प्रत्येकाने आतापासूनच संभाव्य परिस्थिती ओळखून कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे.

ठळक मुद्देकोरोनांनंतरचे जग सर्वांगाने बदललेले असेल, पूर्वीसारखं सामान्य जनजीवन शक्य नाहीएका नव्या आरोग्य संकटाची सुरुवात होईल.. ज्यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाºयांना क्षमा नाही कोरोनासह जगा किंवा रोगराईला सामोरे जा, असेच थेट पर्याय असतील. कुठलेही भेद न जाणणारा कोरोना विषाणू थैमान घालेल

‘कोविड-१९’चा आजार तुमच्या माझ्या आयुष्यात येऊन दोन-अडीच महिने उलटले तरीही आपण कोरोना विषाणूला नीट समजून घेतलेले नाही हे आपल्या जगण्या-वागण्यातून स्पष्ट दिसतेय. आपल्या चुकांमुळेच कोरोना शेफारलाय. या विषाणूला स्वप्रयत्नाने तुमच्या आमच्या शरीरात प्रवेश करता येत नाही.आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाळल्या तर कोरोनाला लांब ठेवणे शक्य आहे. म्हणून हा आजार आणि विषाणू नेमका कसा आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. या आजाराचे विषाणू दोन प्रकाराने पसरतात. पहिल्या प्रकारात बाधित रुग्णाच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. या अतिशय छोट्या तुषारामध्ये देखील अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येने असतात. जे आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या श्वासातून श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. संसर्गाचा दुसरा प्रकार म्हणजे बाधित रुग्णाच्या खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना निरोगी व्यक्तीने हाताने स्पर्श केला आणि तोच हात स्वत:च्या चेहºयाला, नाकाला, तोंडाला, लावला तर त्यातून व्यक्तीला संसर्ग होतो. जगभर थैमान घालणाºया कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून साबणाने हात धुवा, असा साधा उपाय सांगितला आहे. हात कसे धुवावेत त्याविषयी देखील शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली. ‘सोशल डिस्टन्स’ आणि साबणाने हात धुणे यासारख्या परवडणाºया सोप्या उपायांतून संसर्ग रोखता येऊ शकतो. परंतु सहज शक्य गोष्टींचा आपण कंटाळा करतो आणि छोट्याशा दुर्लक्षामुळे संसर्ग होतो. सहज सोपा परंतु थोडासा कंटाळवाणा वाटणाºया या गोष्टी केल्याशिवाय कोरोनावरील लस आणि औषध तयार होईपर्यंत दुसरा पर्याय नाही.

सोलापुरातील सद्यस्थिती खूपच चिंताजनक आहे. हॉटस्पॉट म्हणून शहराची ओळख निर्माण झाली. वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे रेड झोन म्हणून शहर बदनाम होतेय. इथल्या कष्टकरी, गरीब झोपडपट्टीतल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. प्यायला पाणी नाही तर दिवसभर साबणाने धुवायला पाणी कोठून आणणार. सर्दी, खोकला यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसली तरी औषधोपचार घेऊ शकत नाहीत. म्हणून बाधितांची संख्या रोज वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटचा टप्पा संपायला आला. लवकरच परिस्थिती पूर्ववत करावी लागेल, तेव्हा शहरातील जनजीवन कसे असेल याची भीती वाटते. म्हणून प्रत्येकाने आतापासूनच संभाव्य परिस्थिती ओळखून कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे.

कोरोनांनंतरचे जग सर्वांगाने बदललेले असेल. पूर्वीसारखं सामान्य जनजीवन शक्य नाही. एका नव्या आरोग्य संकटाची सुरुवात होईल.. ज्यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाºयांना क्षमा नाही. कोरोनासह जगा किंवा रोगराईला सामोरे जा, असेच थेट पर्याय असतील. कुठलेही भेद न जाणणारा कोरोना विषाणू थैमान घालेल. हळूहळू सगळ्या गोष्टी शासनाच्या ताब्यात जातील. स्वघोषित सत्ताकेंद्रे संपुष्टात येतील आणि त्यावर बढाया मारणारी तरुणाई उघड्यावर येईल. सामाजिक विषमता वाढेल. जनसामान्यांची क्रयशक्ती कमी होईल. आर्थिक परिस्थिती वाईट होईल. मनोरुग्णांची संख्या वाढेल आणि आत्महत्या वाढतील. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे लागेल. म्हणून सोलापूरकरांनी अधिक जबाबदारीने आजच्या संकटाचा मुकाबला करायला तयार व्हावे लागेल. बदल स्वीकारावे लागतील. तरच येत्या केवळ दहा वर्षांनी म्हणजे २०३० मध्ये येऊ घातलेल्या ‘क्लायमेट ३०’सारख्या कोरोनापेक्षा अधिक गंभीर समस्येला सामोरे जाता येईल.- प्रा. विलास बेत(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस