शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:12 IST

विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो.

ठळक मुद्देडबक्यातील पाणी गढूळ : प्रशासन, मंदिर समितीने सोय करण्याची आवश्यकताविठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतोपाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़

प्रभू पुजारी पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किमीचे अंतर पार करून विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो, मात्र सध्या चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडले आहे़ त्यामुळे पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़ नदीपात्रातील डबक्यातील पाणीही गढूळ आहे. प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या स्नानासाठी सोय करावी, अशी मागणी खुलताबाद येथील ज्ञानेश्वर मोठ्ठे यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या मोठ्ठे परिवाराने केली.

पंढरपूरच्या चार मोठ्या वारी सोहळ्यादरम्यान चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसले तरी प्रशासन पाणी सोडून भाविकांची सोय करते़ परंतु पंढरपुरात रोज किमान ३० हजारांपेक्षा जास्त भाविक येतात़ त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी राहावे याची सोय करणे गरजेचे आहे़, असे भाविकांचे म्हणणे आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले आहे़ मात्र सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी कमी पडल्यानंतर आणि मागणी झाल्यावर भीमा नदीत पाणी सोडले जाते़ ते पाणी चंद्रभागा नदीत आल्यानंतर किमान भाविकांच्या स्नानासाठी अडविले पाहिजे़ ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिली आणि काही कालावधीत त्याची उभारणी करण्यात आली़ पण पाणी असल्यानंतर वाळू उपसा करता येत नाही, म्हणून वाळू चोर तेथील बंधाºयाचे दरवाजे उघडतात आणि पाणी वाहून जाते़ याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़ जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते़ तेच पाणी आतापर्यंत नदीपात्रात होते़ आता उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि ते पाणी खाली वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे.

नदीपात्रात काही ठिकाणी डबक्यात पाणी आहे, मात्र तेथे स्थानिक लोक पैसे शोधण्यासाठी फिरत असल्याने ते पाणी गढूळ होते़ त्यामुळे त्या डबक्यात पवित्र स्नान करण्याची मानसिकता होत नसल्याचे भाविकांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरriverनदीwater shortageपाणीटंचाई