शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:12 IST

विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो.

ठळक मुद्देडबक्यातील पाणी गढूळ : प्रशासन, मंदिर समितीने सोय करण्याची आवश्यकताविठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतोपाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़

प्रभू पुजारी पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किमीचे अंतर पार करून विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो, मात्र सध्या चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडले आहे़ त्यामुळे पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़ नदीपात्रातील डबक्यातील पाणीही गढूळ आहे. प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या स्नानासाठी सोय करावी, अशी मागणी खुलताबाद येथील ज्ञानेश्वर मोठ्ठे यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या मोठ्ठे परिवाराने केली.

पंढरपूरच्या चार मोठ्या वारी सोहळ्यादरम्यान चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसले तरी प्रशासन पाणी सोडून भाविकांची सोय करते़ परंतु पंढरपुरात रोज किमान ३० हजारांपेक्षा जास्त भाविक येतात़ त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी राहावे याची सोय करणे गरजेचे आहे़, असे भाविकांचे म्हणणे आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले आहे़ मात्र सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी कमी पडल्यानंतर आणि मागणी झाल्यावर भीमा नदीत पाणी सोडले जाते़ ते पाणी चंद्रभागा नदीत आल्यानंतर किमान भाविकांच्या स्नानासाठी अडविले पाहिजे़ ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिली आणि काही कालावधीत त्याची उभारणी करण्यात आली़ पण पाणी असल्यानंतर वाळू उपसा करता येत नाही, म्हणून वाळू चोर तेथील बंधाºयाचे दरवाजे उघडतात आणि पाणी वाहून जाते़ याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़ जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते़ तेच पाणी आतापर्यंत नदीपात्रात होते़ आता उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि ते पाणी खाली वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे.

नदीपात्रात काही ठिकाणी डबक्यात पाणी आहे, मात्र तेथे स्थानिक लोक पैसे शोधण्यासाठी फिरत असल्याने ते पाणी गढूळ होते़ त्यामुळे त्या डबक्यात पवित्र स्नान करण्याची मानसिकता होत नसल्याचे भाविकांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरriverनदीwater shortageपाणीटंचाई