शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

केंद्रीय पथकाचा दुष्काळी दौरा ; अधिकारी नुसते येत्यात अन् जात्यात पदरात कायबी नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:56 IST

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी ...

ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारीकरमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवातदुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी सुद्धा मिळाली नाही बघा. बँक व सावकाराच्या कर्जासाठी तोंड लपवावं लागतंय आता ..औषध प्यायची पाळी आलीय बघा.. असे निराशेचे बोल आज करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर जातेगावचे शेतकरी किसन मारूती वारे यांनी सुनावले.

करमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी सुभाषचंद्र मीना, एम.जी.टेंभुर्णे व विजय ठाकरे या तीन जणांच्या पथकाने आज सायंकाळी साडेपाच वाजता अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या करमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवात केली. पथकाने जातेगाव येथील किसन मारूती वारे यांच्या दोन एकरातील जळालेल्या कापसाच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर जातेगाव येथेच दत्तात्रय मोरे या शेतकºयांच्या शेतात जाऊन पाहणी केली. दत्तात्रय मोरे याने चार एकरात तुरीचे पीक घेतले होते पावसाअभावी वाढ खुंटल्याने तूर कापून जनावरांना घातली असे या शेतकºयाने पथकातील अधिकाºयांना सांगितले.

दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री गावात ग्रामस्थ पथकाची वाट पाहत होते पण दुष्काळी पाहणी पथक थेट पोथरेमार्गे करमाळ्याजवळ असलेल्या रोसेवाडी येथे आले. तेथे गावातील ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेत अंधारातच  पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली व  दुष्काळी पथक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. 

पथकांसमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, उपजिल्हाधिकारी शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, प्रांताधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, जातेगावचे माजी सरपंच संतोष वारे यांच्यासह पाणीपुरवठा, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती या  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्षणचित्रे..- केंद्रातून दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून सायंकाळी साडेपाच वाजता करमाळा तालुक्यात जातेगाव येथे दाखल झाले.- पथकाने कामोणे व बिटरगाव येथील शिवेवरील  पावसाअभावी जळालेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री येथे पथकाची ग्र्रामस्थ वाट पाहत होते, मात्र पथक बिटरगाव-श्री गावात गेलेच नाही.४रोसेवाडी येथे पथकाने अंधारात ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पिण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेतली व पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार