शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाचा दौरा; फुलाबाईंच्या शेतातील चिखल दोन महिन्यांनंतरही तसाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:22 IST

पथकातील अधिकारी आवक, मातीच्या नुकसानीसाठी कृषी विद्यापीठाची मदत घेण्याची सूचना

ठळक मुद्देअति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आलेपेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधलाशेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी

सोलापूर : आमच्याकडे लई पावूस झाला, बघा रानात अजून चिखल हाय, असे गार्हाणे मांडत फुलाबाई यांनी बोट करून शिवाराची स्थिती निदर्शनात आणताच केंद्रीय पथकातील अधिकारीही आवक झाले. दोन महिन्यांनंतरही शेतात चिखल पाहून झालेल्या अतिवृष्टीची कल्पना येते, असे मत पथकाने यावेळी मांडले.

ॲाक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या पथकात केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उप सचिव यश पाल व रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांचा समावेश आहे. या पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव व पेनूर येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 लांबोटी येथे तात्या चंदनशिवे यांच्या ऊसाची व कोळेगाव येथील देशमुखवस्ती येथील पाण्याने भरलेला बंधारा , परिसरातील शेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून पथकाने माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे भोगावती, सीना आणि नागझिरा नद्यांचे पाणी रात्री अचानक वाढले. यामुळे घर वाहून गेल्याचे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांनी सांगितले.

 पेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधला. फुलाबाईने असा पाऊस या जन्मात पाहिला नाही, असा अनुभव कथन केला. विजया यांनी मका पिकाचे नुकसान दाखविले. पंचनामा झाला आहे, पण अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याची कैफियत मांडली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मदत मिळणार असल्याचे सांगितले. भारत सलगर यांनी पावसाने दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आणले. दोन्ही अधिकार्यांनी बागेत जाऊन नुकसानीचा अंदाज घेतला. कृषी अधिकारी माने यांनी केळीची वाढ व घडभरणीबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी करमाळा तालुक्यात केळीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे निर्यातक्षम केळीच्या बागेत काम करणारे पश्चिम बंगालचे मजूर निघून गेल्याने समस्या निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे निदर्शनाला आणले.

वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण

अति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. व्यास यांनी वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण करून अशी शेती सुधारण्यासाठी आता कृषी विद्यापीठाची मदत घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 

रस्ते नुकसानीची घेतली माहिती

दौऱ्यावर निघण्यापूर्वी पथकाने विश्रामधाम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता शेलार यांनी रस्ते तर पडळकर यांनी वीज कंपनीच्या नुकसानीची माहिती दिली. कृषी अधिकारी माने यांनी जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची सविस्तर आकडेवारी सादर केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, पशुसंवर्धन उपायुक्त सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास कोरे, दत्तात्रय गावडे, संभाजी धोत्रे, सुनील कटकधोंड उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरagricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार