शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

केंद्रीय पथकाचा दौरा; फुलाबाईंच्या शेतातील चिखल दोन महिन्यांनंतरही तसाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:22 IST

पथकातील अधिकारी आवक, मातीच्या नुकसानीसाठी कृषी विद्यापीठाची मदत घेण्याची सूचना

ठळक मुद्देअति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आलेपेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधलाशेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी

सोलापूर : आमच्याकडे लई पावूस झाला, बघा रानात अजून चिखल हाय, असे गार्हाणे मांडत फुलाबाई यांनी बोट करून शिवाराची स्थिती निदर्शनात आणताच केंद्रीय पथकातील अधिकारीही आवक झाले. दोन महिन्यांनंतरही शेतात चिखल पाहून झालेल्या अतिवृष्टीची कल्पना येते, असे मत पथकाने यावेळी मांडले.

ॲाक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या पथकात केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उप सचिव यश पाल व रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांचा समावेश आहे. या पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव व पेनूर येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 लांबोटी येथे तात्या चंदनशिवे यांच्या ऊसाची व कोळेगाव येथील देशमुखवस्ती येथील पाण्याने भरलेला बंधारा , परिसरातील शेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून पथकाने माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे भोगावती, सीना आणि नागझिरा नद्यांचे पाणी रात्री अचानक वाढले. यामुळे घर वाहून गेल्याचे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांनी सांगितले.

 पेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधला. फुलाबाईने असा पाऊस या जन्मात पाहिला नाही, असा अनुभव कथन केला. विजया यांनी मका पिकाचे नुकसान दाखविले. पंचनामा झाला आहे, पण अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याची कैफियत मांडली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मदत मिळणार असल्याचे सांगितले. भारत सलगर यांनी पावसाने दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आणले. दोन्ही अधिकार्यांनी बागेत जाऊन नुकसानीचा अंदाज घेतला. कृषी अधिकारी माने यांनी केळीची वाढ व घडभरणीबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी करमाळा तालुक्यात केळीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे निर्यातक्षम केळीच्या बागेत काम करणारे पश्चिम बंगालचे मजूर निघून गेल्याने समस्या निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे निदर्शनाला आणले.

वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण

अति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. व्यास यांनी वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण करून अशी शेती सुधारण्यासाठी आता कृषी विद्यापीठाची मदत घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 

रस्ते नुकसानीची घेतली माहिती

दौऱ्यावर निघण्यापूर्वी पथकाने विश्रामधाम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता शेलार यांनी रस्ते तर पडळकर यांनी वीज कंपनीच्या नुकसानीची माहिती दिली. कृषी अधिकारी माने यांनी जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची सविस्तर आकडेवारी सादर केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, पशुसंवर्धन उपायुक्त सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास कोरे, दत्तात्रय गावडे, संभाजी धोत्रे, सुनील कटकधोंड उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरagricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार