शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

बजेट आपल्या मनातलं; शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद अपेक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:50 AM

विलास जळकोटकर सोलापूर : पायाभूत शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. शिक्षण दिवसेंदिवस महागडं बनत चाललं आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी ...

ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने संशोधनाला चालना मिळाली पाहिजेसंशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने संशोधनाचा निधी वाढविला पाहिजेशहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एकीकडे खासगी शिक्षणक्षेत्र वाढत असताना त्याचा भुर्दंड पालकांना

विलास जळकोटकर

सोलापूर: पायाभूत शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. शिक्षण दिवसेंदिवस महागडं बनत चाललं आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. शिवाय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने संशोधनाला चालना मिळाली पाहिजे अन् त्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधीची तरतूद करावी, असा सूर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.

विज्ञान तंत्रज्ञानामुळे आज ग्रामीण भागात पाणीपुरवठा, डिजिटल शाळा, व्हर्च्युअल क्लासरुम, उत्कृष्ट आरोग्यसेवा, संपर्क यंत्रणा अशा विविध सुखसुविधा उपलब्ध होत आहेत. संशोधन हा विज्ञान तंत्रज्ञानाचा आत्मा आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी सोयी निर्माण होतील, त्यांच्या समस्या सुटतील, अशा संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने संशोधनाचा निधी वाढविला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्तम बुद्धिमत्ता असते. त्यांच्यामध्ये संशोधनाची क्षमताही असते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील संशोधकांनाही संधी मिळाव्यात आणि त्यांचे संशोधन देशाच्या सर्व भागात पोहोचावे यासाठी केंद्राने तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याची अंदाजपत्रकात तरतूद व्हावी, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एकीकडे खासगी शिक्षणक्षेत्र वाढत असताना त्याचा भुर्दंड पालकांना बसतो आहे. महागडं होणारं शिक्षण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं कंबरडं मोडणारं ठरत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरजही व्यक्त होत आहे.

राष्टÑाची प्रगती ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असते. जे राष्टÑ विज्ञान तंत्रज्ञानात आघाडीवर तेच राष्टÑ जगात अग्रेसर ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी भरभक्कम आर्थिक तरतूद करावी. संशोधन हा विज्ञान तंत्रज्ञानाचा आत्मा आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी सोयी निर्माण होतील.- प्रा. डा. सुनील विभूते, विज्ञान कथा लेखक

तांत्रिक शिक्षणासाठी आपल्याकडे अंदाजपत्रकात अवघी साडेतीन टक्के रकमेची तरतूद आहे. भारत हा जगातला युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात विकसित देशाच्या तुलनेत शासनाने तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणासाठी अंदाजपत्रकात किमान ६ टक्के तरतूद करण्याची गरज आहे. तसे झालेतर देशाबाहेर शिक्षणासाठी जाणारा लोंढा थांबेल. दर्जेदार शिक्षण मिळणे शक्य आहे. शिक्षण आणि आरोग्य मोफत असायला हवं. - प्रा. डॉ. जी. के. देशमुखसंस्थापक अध्यक्ष व्हीव्हीपी इंजिनिअरिंग, सोलापूर

गेल्या चार वर्षात शालेय शिक्षणाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. शिक्षकांची भरती बंद आहे. अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद न केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची दुरवस्था झाली आहे. शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. अपुरी तरतूद केल्याने शिक्षण क्षेत्रात नवे तंत्रज्ञान, नवीन उपक्रम राबविणे अडचणीचे ठरते. केंद्र आणि राज्य शासनाने शिक्षण विभागासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी. - तानाजी माने, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाBudget 2019अर्थसंकल्प 2019