शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

भाऊ, माझी काळजी करू नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:19 PM

परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो.

परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो. बसस्टँडला मी माझ्या ताईला पुणे गाडीत बसवलं, माझ्यासारखे असे अनेक भाऊ होते, बहिणीही होत्या, कानावर शब्द आले.. भाऊ, माझी काही काळजी करू नको. मी बरी हाय, थोडं दिवस गेलं की सारं नीट होईल. बहीण हळुवार शब्दांनी स्वत:ला व काळजीत असणाºया भावाला धीर देत होती. नशिबापुढं कुणाला जाता येतं होय. सारं ऐकताना भावनावश झालो. बहिणीचं खरं प्रेम कोर्टात बापाच्या संपत्तीचा अधिकार सोडतानाच्या सही देताना कळतं, असा संदेश मीडियातून पसरवला जातो. पण हे ऐकल्यानंतर अजून नात्यासाठी काळजातली ओल कायम असलेली दिसली. बरं वाटलं.

निश्चितच अनेक विदारक वास्तव आहे. बहीण-भाऊ सख्ख्या नात्यात बोलत नाहीत. प्रेमळ सुसंवाद नाही. अगदी किरकोळ कारणासाठी समज, गैरसमजुती व संपत्तीसाठीही मनं कटू होताना दिसतात. हे असे सण ते सारं दुरुस्त होण्यासाठी तर असतात. पण दुसºया बाजूला या प्रसंगासारखी जीव लावणारी, नातं जपणारी माणसंही आहेतच की.

आज अनेक भाऊ-बहीण खरंच जगाला हेवा वाटावा असं राहतात, परिस्थिती कशीही असू दे. नाती जपण्याची ताकत मिळवावी लागेल. दिलं घेतलं पुरत नसतं, पण वेळप्रसंगी धावून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. आपल्या अवतीभोवती असे हजारो बहीण-भाऊ व असे संवाद आपणही पाहिले, ऐकले असतील मग संवेदना शून्यतेचाच अधिक बोलबाला का होताना दिसतो. घराघरांतून यथाशक्ती हा सण साजरा झाला. दिवसभर गाड्यावरून व गाड्यांमधून भावाबहिणींची धावपळ दिसली. राखी खरेदी करताना बहिणीचा अधिक सुंदरतेचा चाललेला अट्टाहास भावाची अधिकाधिक ओवाळणी वा भेटवस्तू देण्यासाठी चाललेला प्रयत्न हे सारं फार प्रेमाने चालू असतं. यात पूर्वीचा भाबडा भाव जरी कमी झाला असला तरी अत्याधुनिक काळातही तो टिकून आहे हे कमी नाही ना? 

ज्या घरात ही नाती परिपूर्ण नाहीत. उपलब्ध नाहीत किंवा आहेत तरीही ते मानसबंधू, वडीलबंधू, ईश्वरबंधू, गुरुबंधू तसेच सीमेवरती अहोरात्र परिश्रम घेणारे जवान, कामावरील पोलीस, अनाथाश्रमात बंधुभावाने हा सण साजरा करताना पाहून मन भरून येते आणि तेव्हाच शाळेतील प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत, या शब्दांचा अर्थ समाजात रुजताना दिसतो. असंच म्हणता येईल नाही का? सर्वच जातीधर्माचे लोक हा सण साजरा करतात. हे पाहताना मन सुखावून जायला हरकत नाही, नक्कीच असते. अनेक ठिकाणी नात्यात वाईट स्थिती, पण आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करू या ना? 

आज शिक्षण, उद्योग-व्यवसाय, नोकरी यानिमित्ताने अनेक भाऊ-बहीण देश-विदेशात असले तरी आॅनलाईन रक्षाबंधन साजरे करताना दिसतात. प्रेमतर तेच असतं ना? बहीणभावाचं नशीबवान ते जे असा आनंद देण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. खरंच बहिणींची काळजी करणारा, घेणारा भाऊ व कायम भावाचं योगक्षेम राहण्यासाठी देवाला हात जोडणारी बहीण यांचं नातं अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण खरंच अत्यंत पवित्र आहे. सर्वच भावा-बहिणींनी ते जपण्यासाठी धडपड करावीच.

सण सरुन गेला, मीही साजरा केला. पण कानात ते बहिणीची पाठवणी करणारा भावा-बहिणीचे शब्द. ‘भाऊ माझी काळजी करू नको..’ हे शब्द खूप वेळ घुमत होते. संवेदनाची सर्वोच्च अवस्था होती ती...- रवींद्र देशमुख(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरRakhiराखी