शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

महाराष्ट्रातील भटक्यांचे प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यावर आणा : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:10 IST

सातव्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे उद्घाटन

ठळक मुद्देराष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या वतीने सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशनफसवणूक करणाºया सरकारला घरी पाठवा : गायकवाडमहाराष्ट्रात भटक्यांना एससी प्रवर्गात जाणीवपूर्वक घातले नाही - गायकवाड

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याला ७१ वर्षे पूर्ण झाली तरी भटक्या समाजाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत़ रेणके आयोगाच्या अहवालानुसार प्रत्येक राज्यात भटका समाज विखुरला आहे़ उलट त्यांच्यापुढील प्रश्न वाढत चालले आहेत़ त्यांची आंतरिक आणि बाह्य कारणे तपासली पाहिजेत़ त्यांचे प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यावर आणले पाहिजेत. त्याशिवाय विकास होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले़ 

राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडले़ या अधिवेशनाचे उद्घाटन भटक्या विमुक्तांचे अभ्यासक, ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते झाले़ यावेळी अ़ भा़ धनगर समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड, भटक्या विमुक्तांचे अभ्यासक प्रशांत पवार, भटक्या विमुक्त जमातीचे राज्य अध्यक्ष अमीनभाई जामगावकर, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, राष्ट्रीय भटक्या विमुक्त मोर्चाच्या प्रसारक सुनीता राठोड, डॉ़ अजीज नदाफ, वडार समाजाचे अध्यक्ष शिवलिंग सुकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव, जात पडताळणी कार्यालयाचे नागेश चौगुले, छप्परबंद समाजाचे इब्राहीम विजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

मेश्राम यांनी स्वातंत्र्य चळवळीचा संदर्भ घेत ही चळवळ स्वातंत्र्यासाठी नव्हती तर ती ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याची होती, असे म्हणाले़ इंग्रजांचे गुलाम होण्यापूर्वी आपण सारे ब्राह्मणांचे गुलाम होतो़ आता ब्राह्मण सत्तेवर आले आहेत़ आता ब्राह्मणांकडून भटक्या समाजाला स्वातंत्र्य मागावे लागणार आहे़ जे लोक चपराशी बनू देत नाहीत, ते स्वातंत्र्य काय देणार? असा सवाल त्यांनी केला़ या देशात पाच राष्ट्रीय पक्ष हे ब्राह्मणांचेच आहेत़ निवडणूक आयोगाने बसपाच्या मायावती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना नोटीस बजावली आहे़ आपली मतसंख्या घटतेय़ पक्षाची मान्यता का रद्द करू नये? अशी विचारणा केली आहे़ यावेळी नागनाथ चौगुले, सुनीता राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ 

फसवणूक करणाºया सरकारला घरी पाठवा : गायकवाडउद्घाटक म्हणून बोलत असताना, महाराष्ट्र सरकारने भटक्यांच्या विकासासाठी साधं एक हजाराची बजेट तरतूद करत नाही, या समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे़ त्यांना घरी पाठवा, असे आवाहन उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी केले़ भारतातील गिरण्यांमध्ये सर्वाधिक रोजगार आणि आरक्षण हे भटक्यांना मिळाले़ १९०९ ते १९१३ काळात भटक्यांसाठी इंग्रजांनी स्वतंत्र बजेट देऊन कौशल्य प्रशिक्षण दिले होते़

बारामतीत इतका मोठा समाज स्थायिक झाला असताना बारामतीकरांनी त्यांचा विकासच केला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली़ भटक्यांसाठी इंग्रजांनी १९१३ मध्ये सुरू केलेले सोशल वेल्फेअर १९७३ ला बंद केले़ अडीच कोटी भटक्यांना आजही गुन्हेगार समजले जातात़ महाराष्ट्रात भटक्यांना एससी प्रवर्गात जाणीवपूर्वक घातले नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी के ला़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSC STअनुसूचित जाती जमाती