शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षांमध्ये १८ हजार जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:13 IST

राजस्थानी विकास मंडळाचा उपक्रम; दर स्वातंत्र्यदिनी होतेय शिबीर

ठळक मुद्देराजस्थानी विकास मंडळातर्फे धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यात आलेयंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्ष होतेसोलापुरात राजस्थानी विकास मंडळाची स्थापना ७० वर्षांपूर्वी करण्यात आली

सोलापूर : रक्तदानाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र रक्तदानातून सलग २३ वर्षे समाजाची सेवा करणे ही अवघड बाब आहे. राजस्थानी विकास मंडळाने रक्तदानाचा उपक्रम घेत २३ वर्षांत १८ हजार ६७० रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करत एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. 

यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्ष होते. या शिबिरात ५५१ जणांनी रक्तदान केले. सोलापुरात राजस्थानी विकास मंडळाची स्थापना ७० वर्षांपूर्वी करण्यात आली. राजस्थान येथून सोलापुरात आलेल्या कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकास राजस्थानी विकास मंडळात सहभागी करुन घेण्यात आले आहे. एकत्र राहून समाजोपयोगी काम करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. एखादा उपक्रम हाती घेतल्यास तो सतत पुढे चालू ठेवण्यासाठी मंडळाचा प्रयत्न असतो. 

असाच रक्तदान शिबीर घेण्याचा हा उपक्रम आहे. दरवर्षी घेण्यात येणाºया या शिबिरात ७० टक्के रक्तदाते हे नेहमीचे आहेत. जे दरवर्षी रक्तदान करतात तर ३० टक्के नव्याने जुळले जातात. रक्तदान करणाºयांमध्ये ४० ते ५० वेळा रक्तदान करणारे अनेक रक्तदाते आहेत. अशा रक्तदात्यांमुळे राजस्थानी विकास मंडळाकडून रक्तदानाची चळवळ सुरु आहे.

गरजू रुग्णांना मदतराजस्थानी विकास मंडळातर्फे धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना याचा वापर होतो. तसेच काही रुग्णांना रक्ताची पिशवी घेण्याची ऐपत नसते, त्यांनादेखील राजस्थानी विकास मंडळाकडून रक्त घेण्यास सहकार्य केले जाते. एखाद्या गरजूचा जीव वाचला तर यापेक्षा चांगले कार्य असू शकत नाही. यंदा रक्तदान शिबिरास २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यातही हा उपक्रम सुरुच राहील, असा विश्वास विजयकुमार जाजू यांनी बोलून दाखविला.

टॅग्स :SolapurसोलापूरBlood Bankरक्तपेढी