शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता टिकविण्यासाठी भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:08 IST

प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पेरून केले जातेय नियोजन

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी - आंबेडकरदेशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे - आंबेडकरसंविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - आंबेडकर

सोलापूर : अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर मिळविलेली सत्ता भविष्यात टिकविण्यासाठी विद्यमान भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. सीमेवर सैनिक लढणार आणि देशात सत्ता मिळविण्यासाठी भाजप लढणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्या पेरण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर आले असता शासकीय विश्रामगृहात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे़ मंगळवेढा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मदत जाहीर करून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. वास्तविक पाहता अशा खोट्या अफवा पसरवून हे वातावरण कोण निर्माण करीत आहे, याचा शोध शासनाने घेतला पाहिजे. या सर्व प्रकारामागे एक यंत्रणा आहे़ सायबर क्राइमने याबाबत जागरुक राहून अफवा पसरविणाºयांना अटक करावी. पोटासाठी भटकंती करणाºया या समाजाचे पुनर्वसन करावे. त्यांना जमिनी देऊन भटकंती थांबवावी, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. 

दर तीन महिन्यांतून अशा पद्धतीची दहशत सध्या राज्यात आणि देशात पसरविली जात आहे. देशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे. मनुवादाला संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. सामाजिक सलोखा आणि सर्वजण एकत्र येणे याचा सामाजिक आशय असला तरी राजकीय सत्ता हस्तगत करणे हा मूळ उद्देश आहे.

गेल्या ७0 वर्षांत एकही अतिमागास ओबीसी समाजातील व्यक्ती लोकसभेत गेली नाही. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही. एस.सी., एस.टी.ला राखीव जागा असल्याने नाईलाजास्तव त्यांना उमेदवारी दिली जाते. आम्ही ठरविले आणि स्वतंत्र वाटचाल सुरू केली. संविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत धनगर, माळी, मुस्लीम आणि अन्य समाजाला मान्य करीत असाल तरच आम्ही धर्मनिरपेक्षवाद्यांसोबत जाण्यास तयार आहोत. 

काँग्रेस पक्षात दुर्दैवाने घराणेशाही निर्माण झाली आहे. त्यांनी सत्तेत राहावे हरकत नाही, मात्र त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे. लोकशाहीचे सामाजिकरण करावे तरच लोकशाही यशस्वी होईल, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजयराव मोरे, अर्जुन सलगर, उत्तम नवघरे आदी उपस्थित होते. 

दहशत पसरविणे सत्ताधाºयांचा बेस...- माझ्या हातून दंगल घडू नये म्हणून आज मुस्लीम समाज पोलीस स्टेशनमध्ये जात नाही म्हटल्यावर देशात आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचा मुद्दा मांडूनही काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्य मार्गाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दहशत पसरविणे हा सत्ताधाºयांचा मूळ बेस आहे. प्रत्येक घटनेनंतर पंतप्रधानांची मुलाखत केविलवाण्या सरपंचासारखी असते. ही स्थिती बदलायची असेल तर २0१९ च्या निवडणुकीत सर्व जाती-धर्मांनी एकत्र आले पाहिजे, असेही यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाGovernmentसरकारPakistanपाकिस्तान