शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

सत्ता टिकविण्यासाठी भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:08 IST

प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पेरून केले जातेय नियोजन

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी - आंबेडकरदेशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे - आंबेडकरसंविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - आंबेडकर

सोलापूर : अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर मिळविलेली सत्ता भविष्यात टिकविण्यासाठी विद्यमान भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. सीमेवर सैनिक लढणार आणि देशात सत्ता मिळविण्यासाठी भाजप लढणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्या पेरण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर आले असता शासकीय विश्रामगृहात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे़ मंगळवेढा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मदत जाहीर करून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. वास्तविक पाहता अशा खोट्या अफवा पसरवून हे वातावरण कोण निर्माण करीत आहे, याचा शोध शासनाने घेतला पाहिजे. या सर्व प्रकारामागे एक यंत्रणा आहे़ सायबर क्राइमने याबाबत जागरुक राहून अफवा पसरविणाºयांना अटक करावी. पोटासाठी भटकंती करणाºया या समाजाचे पुनर्वसन करावे. त्यांना जमिनी देऊन भटकंती थांबवावी, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. 

दर तीन महिन्यांतून अशा पद्धतीची दहशत सध्या राज्यात आणि देशात पसरविली जात आहे. देशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे. मनुवादाला संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. सामाजिक सलोखा आणि सर्वजण एकत्र येणे याचा सामाजिक आशय असला तरी राजकीय सत्ता हस्तगत करणे हा मूळ उद्देश आहे.

गेल्या ७0 वर्षांत एकही अतिमागास ओबीसी समाजातील व्यक्ती लोकसभेत गेली नाही. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही. एस.सी., एस.टी.ला राखीव जागा असल्याने नाईलाजास्तव त्यांना उमेदवारी दिली जाते. आम्ही ठरविले आणि स्वतंत्र वाटचाल सुरू केली. संविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत धनगर, माळी, मुस्लीम आणि अन्य समाजाला मान्य करीत असाल तरच आम्ही धर्मनिरपेक्षवाद्यांसोबत जाण्यास तयार आहोत. 

काँग्रेस पक्षात दुर्दैवाने घराणेशाही निर्माण झाली आहे. त्यांनी सत्तेत राहावे हरकत नाही, मात्र त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे. लोकशाहीचे सामाजिकरण करावे तरच लोकशाही यशस्वी होईल, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजयराव मोरे, अर्जुन सलगर, उत्तम नवघरे आदी उपस्थित होते. 

दहशत पसरविणे सत्ताधाºयांचा बेस...- माझ्या हातून दंगल घडू नये म्हणून आज मुस्लीम समाज पोलीस स्टेशनमध्ये जात नाही म्हटल्यावर देशात आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचा मुद्दा मांडूनही काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्य मार्गाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दहशत पसरविणे हा सत्ताधाºयांचा मूळ बेस आहे. प्रत्येक घटनेनंतर पंतप्रधानांची मुलाखत केविलवाण्या सरपंचासारखी असते. ही स्थिती बदलायची असेल तर २0१९ च्या निवडणुकीत सर्व जाती-धर्मांनी एकत्र आले पाहिजे, असेही यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाGovernmentसरकारPakistanपाकिस्तान