शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

मोठी बातमी; मुंबईसाेबत साेलापूर महापालिका तयार करतेय ‘क्लायमेट ॲक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:57 IST

कार्बन न्यूट्रल कार्यक्रम - इलेक्ट्रिक वाहने, साेलरचा वापर वाढविणार, पर्यावरण विभागाकडून मिळू शकताे विशेष निधी

राकेश कदम

साेलापूर -राज्याच्या पर्यावरण विभागाने कार्बनमुक्तीसाठी हाती घेतलेल्या ‘कार्बन न्यूट्रल’ प्रायाेगिक कार्यक्रमात मुंबई, नाशिक, औरंगाबादसाेबत साेलापूरचा समावेश झाला आहे आहे. यातून शहरात आगामी दिवसांत इलेट्रिक वाहनांचा वापर वाढविणे, साैर ऊर्जा निर्मितीला प्राेत्साहन देणे, घनकचरा, सांडपाणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ संस्थेने ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करीत आहे.

राज्यातील माेठ्या शहरांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्राेजनचे प्रमाण वाढत आहे. यातून पाणी, माती, वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. शिवाय तापमान वाढ डाेकेदुखी ठरत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी ‘कार्बन न्यूट्रल’ उपक्रमाची घाेषणा केली हाेती. यातंर्गत चार शहरांमध्ये प्रायाेगिक तत्त्वावर विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, डब्ल्यूआरआयचे प्रकल्प व्यवस्थापक मेहुल पटेल यांनी महावितरण, आरटीओ, पाेलीस अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांची बैठक घेतली. शहरात काेणत्या घटकातून जास्त प्रदूषण हाेते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययाेजना कराव्या लागतील याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे.

--

बससेवा पुन्हा सुरू हाेण्याची आशा

डब्ल्यूआरआयचे प्रकल्प अधिकारी मेहूल पटेल म्हणाले, ऊर्जा निर्मिती करताना काेळशाचा वापर हाेताे. यातून हवेचे प्रदूषण वाढते. वाहनांमुळे हवेचे माेठे प्रदूषण हाेते. घनकचरा व सांडपाण्याच्या गहाळ नियाेजनामुळे मातीचे प्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध कामे हाेतील. शासन यासाठी विशेष निधी देऊ शकते. खासगी वाहने बंद करून सार्वजनिक इलेक्ट्रिक बस वाहतूक सुरू करण्यास आम्ही सांगणार आहाेत.

--

कारखान्यांवर येईल नियंत्रण

शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. याचे अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर दरराेज अपलाेड हाेता. स्मार्ट सिटी, महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे धुलिकण वाढले आहेत. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने, साखर कारखान्यामुळे वायू, भूमीप्रदूषण वाढल्याचे महापालिकाच सांगते. यावरही उपाययाेजना हाेऊ शकतात.

--

महापालिकेत आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू हाेईल. इतरांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्राेत्साहन दिले जाईल. २०५० वर्षाचा विचार करून क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल. कार्बनमुक्तीच्या कामात महापालिकेची भूमिका महत्त्वाची असेल.

- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाMumbaiमुंबई