शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

मोठी बातमी; मुंबईसाेबत साेलापूर महापालिका तयार करतेय ‘क्लायमेट ॲक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:57 IST

कार्बन न्यूट्रल कार्यक्रम - इलेक्ट्रिक वाहने, साेलरचा वापर वाढविणार, पर्यावरण विभागाकडून मिळू शकताे विशेष निधी

राकेश कदम

साेलापूर -राज्याच्या पर्यावरण विभागाने कार्बनमुक्तीसाठी हाती घेतलेल्या ‘कार्बन न्यूट्रल’ प्रायाेगिक कार्यक्रमात मुंबई, नाशिक, औरंगाबादसाेबत साेलापूरचा समावेश झाला आहे आहे. यातून शहरात आगामी दिवसांत इलेट्रिक वाहनांचा वापर वाढविणे, साैर ऊर्जा निर्मितीला प्राेत्साहन देणे, घनकचरा, सांडपाणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ संस्थेने ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करीत आहे.

राज्यातील माेठ्या शहरांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्राेजनचे प्रमाण वाढत आहे. यातून पाणी, माती, वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. शिवाय तापमान वाढ डाेकेदुखी ठरत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी ‘कार्बन न्यूट्रल’ उपक्रमाची घाेषणा केली हाेती. यातंर्गत चार शहरांमध्ये प्रायाेगिक तत्त्वावर विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, डब्ल्यूआरआयचे प्रकल्प व्यवस्थापक मेहुल पटेल यांनी महावितरण, आरटीओ, पाेलीस अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांची बैठक घेतली. शहरात काेणत्या घटकातून जास्त प्रदूषण हाेते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययाेजना कराव्या लागतील याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे.

--

बससेवा पुन्हा सुरू हाेण्याची आशा

डब्ल्यूआरआयचे प्रकल्प अधिकारी मेहूल पटेल म्हणाले, ऊर्जा निर्मिती करताना काेळशाचा वापर हाेताे. यातून हवेचे प्रदूषण वाढते. वाहनांमुळे हवेचे माेठे प्रदूषण हाेते. घनकचरा व सांडपाण्याच्या गहाळ नियाेजनामुळे मातीचे प्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध कामे हाेतील. शासन यासाठी विशेष निधी देऊ शकते. खासगी वाहने बंद करून सार्वजनिक इलेक्ट्रिक बस वाहतूक सुरू करण्यास आम्ही सांगणार आहाेत.

--

कारखान्यांवर येईल नियंत्रण

शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. याचे अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर दरराेज अपलाेड हाेता. स्मार्ट सिटी, महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे धुलिकण वाढले आहेत. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने, साखर कारखान्यामुळे वायू, भूमीप्रदूषण वाढल्याचे महापालिकाच सांगते. यावरही उपाययाेजना हाेऊ शकतात.

--

महापालिकेत आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू हाेईल. इतरांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्राेत्साहन दिले जाईल. २०५० वर्षाचा विचार करून क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल. कार्बनमुक्तीच्या कामात महापालिकेची भूमिका महत्त्वाची असेल.

- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाMumbaiमुंबई