शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सोलापुरात शुभराय मठात रंगली भजनं; आषाढीनिमित्त बुधवारी शहरातून रथोत्सव

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 14, 2024 19:24 IST

बुधवारी आषाढी एकादशीदिनी पवमान म्हणत अभिषेक करून शहरातून रथोत्सव काढला जाणार असल्याची माहिती शुभांगी बुवा यांनी दिली.

सोलापूर : दत्त चौकातील शुभराय महाराज मठात आषाढ मास नवरात्रोत्सव सुरू असून या नऊ दिवसात दरराेज सायंकाळी महिला मंडळांची भारुडं अन् भजनं होताहेत. बुधवारी आषाढी एकादशीदिनी पवमान म्हणत अभिषेक करून शहरातून रथोत्सव काढला जाणार असल्याची माहिती शुभांगी बुवा यांनी दिली.

यंदा रथोत्सवाचे २३९ वे वर्षे असून १७८५ पासून हा उत्सव होतोय. आषाढी एकादशीच्या दिवसी देवाची मूर्ती स्थापन केली आणि तो दिवस देवाचा वाढदिवस म्हणून धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. याला आषाढीचा उत्सवही म्हणून पाहिले जाते. यंदा ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान दररोज दुपारी आणि सायंकाळी महिला भजनी मंडळाचे भजन सादरीकरण होत आहे. केवळ भजनच नव्हे तर भारुड, टिपरी, फुगडी अशा विविध कलेचे सादरीकरण होत आहे.

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसी १६ जुलै रोजी दशमीला भक्तांना फराळ देऊन आषाढ मासातील नवरात्रोत्सवाची सांगता होत आहे. त्याच दिवसी सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे बांधव मंदिर परिसरात २६ फुटी रथाची बांधणी करतात आणि दुसऱ्या दिवसी दत्त चौकातून रथ निघतो.

भक्तीभावात निघणार रथोत्सव* बुधवारी, १७ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता पांडुरंग उपाध्ये आणि सहकारी यांच्यावतीने देवाच्या मूर्तीस पवमान म्हणत अभिषेक केला जाणार आहे.* सकाळी १०:३० वाजता दुधगीकर कुटुंब आणि शुभराय भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ सादर होणार आहे.* दुपारी १२ वाजता महाआरती करून दत्त चौकातून स्टार बेकरी मार्गे रथ मार्गस्थ होईल.* नवीपेठ कॉर्नर, चौपाड विठ्ठल मंदिर, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, टेलिफोन भवन, चाटीगल्ली, सराफ कट्टा, भांडे गल्ली, माणिक चौक, फौजदार चावडी, खाटीक मशीद मार्गे दत्त चौकात रथ परत येईल.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी