शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

बांबूला हवाय लोकाश्रय अन् राजाश्रय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक ...

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक पिकांना थोडासा फाटा देऊन बांबूशेतीकडे वळले-वळत आहेत, दुसरीकडे बांबूच्या वस्तू महागड्या असल्या तरी त्याकडे सध्या श्रीमंत लोकांचे आकर्षण वाढत आहे. मोठ-मोठी कार्यालये, बंगले, फॉर्महाऊस व हॉटेल्सच्या रुबाबात भर घालून बांबूच्या वस्तूंनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे मागासवर्गीय संवर्गातील जातीतील एका कुटुंबास पाच एकर जमीन मोफत देणार आहे, त्यासाठी महात्मा फुले महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवड करता येऊ शकते. एवढेच नव्हे तर सरकारने १९७२ च्या वन कायद्यातून अत्यंत जाचक अटी व तरतुदी रद्द करून बांबूला जंगल (वन) मुक्त केले. बांबूला लाकडाऐवजी गवताचा दर्जा दिला, त्यामुळे अनेक वर्षांचा अडथळा दूर होऊन विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.

जगाच्या एकूण बांबू लागवड क्षेत्रापैकी १९ टक्के क्षेत्र भारतात आहे त्यापैकी फक्त ६ क्षेत्रावर बांबू उत्पादन घेतले जात असले तरी भारत अग्रक्रमावर आहे, तर बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन हा देश लाकडाला पर्याय म्हणून ७० टक्के बांबूचा वापर करीत आहे. त्यामुळे भारतात तेथून बांबूच्या काही वस्तू आयात कराव्या लागतात.

एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास भारताला दरवर्षी २ लाख ३० मेट्रिक टन उदबत्ती लागते त्यापैकी १ लाख ७० मेट्रिक टन उदबत्ती चीनहून आयात करावी लागते. म्हणजे तेवढा पैसा बाहेर जातो. जगात बांबूच्या १५०० जाती आहेत,त्यातील १००-१५० जातीचे बांबू पीक घेण्याचा प्रयत्न भारतात केला जात आहे, त्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी वन खात्यावर सोपविली आहे. अनेक तरुणांना विशेषतः बांबूवर जीवन जगणाऱ्या बुरुड समाजास होत आहे. आज बेरोजगार तरुण, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बांबुशेती व बांबुउद्योग हा एक आशेचा किरण बनला आहे, हे मात्र खरे आहे.

- दशरथ वडतिले (लेखक सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष आहे.)