शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बांबूला हवाय लोकाश्रय अन् राजाश्रय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक ...

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक पिकांना थोडासा फाटा देऊन बांबूशेतीकडे वळले-वळत आहेत, दुसरीकडे बांबूच्या वस्तू महागड्या असल्या तरी त्याकडे सध्या श्रीमंत लोकांचे आकर्षण वाढत आहे. मोठ-मोठी कार्यालये, बंगले, फॉर्महाऊस व हॉटेल्सच्या रुबाबात भर घालून बांबूच्या वस्तूंनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे मागासवर्गीय संवर्गातील जातीतील एका कुटुंबास पाच एकर जमीन मोफत देणार आहे, त्यासाठी महात्मा फुले महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवड करता येऊ शकते. एवढेच नव्हे तर सरकारने १९७२ च्या वन कायद्यातून अत्यंत जाचक अटी व तरतुदी रद्द करून बांबूला जंगल (वन) मुक्त केले. बांबूला लाकडाऐवजी गवताचा दर्जा दिला, त्यामुळे अनेक वर्षांचा अडथळा दूर होऊन विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.

जगाच्या एकूण बांबू लागवड क्षेत्रापैकी १९ टक्के क्षेत्र भारतात आहे त्यापैकी फक्त ६ क्षेत्रावर बांबू उत्पादन घेतले जात असले तरी भारत अग्रक्रमावर आहे, तर बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन हा देश लाकडाला पर्याय म्हणून ७० टक्के बांबूचा वापर करीत आहे. त्यामुळे भारतात तेथून बांबूच्या काही वस्तू आयात कराव्या लागतात.

एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास भारताला दरवर्षी २ लाख ३० मेट्रिक टन उदबत्ती लागते त्यापैकी १ लाख ७० मेट्रिक टन उदबत्ती चीनहून आयात करावी लागते. म्हणजे तेवढा पैसा बाहेर जातो. जगात बांबूच्या १५०० जाती आहेत,त्यातील १००-१५० जातीचे बांबू पीक घेण्याचा प्रयत्न भारतात केला जात आहे, त्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी वन खात्यावर सोपविली आहे. अनेक तरुणांना विशेषतः बांबूवर जीवन जगणाऱ्या बुरुड समाजास होत आहे. आज बेरोजगार तरुण, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बांबुशेती व बांबुउद्योग हा एक आशेचा किरण बनला आहे, हे मात्र खरे आहे.

- दशरथ वडतिले (लेखक सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष आहे.)