शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आठवड्यात तीन हजार गुजराती माठांची आवक ; बिहारी विक्रेत्यांकडून सोलापुरात घरोघरी विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 12:04 IST

अहमदाबाद (गुजरात) येथून आठवड्यातून एकदा  हजार माठ ट्रकने सोलापुरात आणतात.

ठळक मुद्देग्राहकांची पसंती : पांढºया रेतीपासून बनतात लाल रंगाचे आकर्षक डेरे, घरोघरी जाऊन व्यवसायपारंपरिक माठापेक्षा कमी किमतीत आणि जास्त थंडगार पाणी मिळत असल्याने माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

यशवंत सादुल

सोलापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वसामान्यांचे फ्रीज समजल्या जाणाºया माठाची खरेदी करण्याची लगबग सर्वत्र दिसून येते. सध्या पांढºया रेतीपासून बनविलेले लालभडक माठ डोक्यावर घेऊन तसेच सोलापूरच्या गल्लीबोळात, घरोघरी गुजराती माठांची विक्री करणारे बिहारी बांधवही दिसून येत आहेत.

पारंपरिक माठापेक्षा कमी किमतीत आणि जास्त थंडगार पाणी मिळत असल्याने माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. आठवड्यातून तीन हजार माठांची गुजरातमधून येथे आवक होते. बिहारी विक्रेते हे माठ घरोघरी जाऊन विकतात. बिहारमधील पाटणा, मुझ्झफरपूरमधील कुंभार समाजातील शेतकरी असलेले पंधरा ते वीस बिहारी विके्रते मागील दोन वर्षांपासून माठ विकण्यासाठी सोलापुरात येत आहेत. यंदा विजयपूर रोडवर आपला डेरा टाकला आहे. अहमदाबाद (गुजरात) येथून आठवड्यातून एकदा  हजार माठ ट्रकने सोलापुरात आणतात. त्यास रंगरंगोटी करून विक्रीसाठी सज्ज करून ठेवतात. चार ते साडेचार किलो वजनाचा एक माठ असतो. एक विक्रेता साधारणत: २० ते २२ माठ घेऊन सकाळी निघतो.

दिवसभर दोन टप्प्यात ४० माठ विकतात. १५० रुपये किंमत असली तरी टिकाऊपणा आणि पाणी थंड होण्याची खात्री कृतीतून पटवून देतात़ पाच ते सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुंबई, भिवंडी, नालासोपारा, घाटकोपर येथे व्यवसायाच्या निमित्ताने आले़ सोलापुरात व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदा परत आल्याचे रामचंद्र पंडित प्रजापती यांनी सांगितले. 

कर्नाटकातील विजयपूरपर्यंत विक्रीसाठी जात आहेत. उन्हाळा संपला की परत गावाकडे जाऊन शेती, कुंभारकाम करतात. यंदा संजय प्रजापती, सुरिंदर पंडित प्रजापती, विश्वनाथ पंडित, रामचंद्र पंडित,अनिल पंडित यांच्यासह १५ ते २० विके्रते आले असून, गुजराती माठांसोबत पुढच्या वर्षी वजनाने हलके, फक्त मातीचे असणारे, कलाकुसरीच्या राजस्थानी माठ विक्रीसाठी आणणार असल्याचे रमेश शाह प्रजापती यांनी सांगितले.

आठवड्यातून एकदा अडीच ते तीन हजार माठ गुजरातहून येतात़ ते फुटू नयेत म्हणून त्यास गवताचे आवरण असते. तरीही वाहतूक करताना किमान २५ ते ३० टक्के माठ फुटतात. सोलापुरातील ग्राहकांना घरपोच सेवा दिली तरी भाव कमी करण्याची मानसिकता असल्याने वाजवी किमतीत सरासरी दीडशे रुपयांना एक याप्रमाणे विक्री केली जाते.

वाळूमुळे टणकपणा- गुजरातमध्ये नदीच्या पांढºया वाळूपासून माठ बनवितात.त्यात फक्त पंचवीस टक्के मातीच असते़ वाळूमुळे माठ टणक बनून टिकाऊ राहतात़ हाताळताना फुटण्याची शक्यता कमी असते.

पाणी झिरपण्यासोबत कमी वेळेत जास्त थंड होते. इतर माठांच्या तुलनेत कमी किमतीमुळे ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत़ येथील प्रतिसादामुळे पुन्हा सोलापुरात आलो आहोत़- संजय प्रजापती,विके्रते 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळ