शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:24 AM

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला.

ठळक मुद्देमोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला : अण्णा हजारे पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही : अण्णा हजारे तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल : अण्णा हजारे

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि २९ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे व शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या साडेतीन वर्षात मोदींनी काहीच केले नसल्यामुळे हे वचन भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कलबुरगी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. शेतकºयांच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने कलबुरगी येथील शरणबसवेश्वर संस्थान मैदानावर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नवी दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ.एस.ए.पाटील कलबुरगीच्या श्रीगुरू विद्यापीठाचे अध्यक्ष बसवराज दिग्गावी, जेष्ठ पत्रकार श्रीनिवास शिरनूरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकºयांच्या प्रश्नावर व प्रशासनातील भ्रष्टाचारावर आपली परखड मते मांडली. हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील हे अध्यक्षपदी होते. दयानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेचे धर्मेंद्र उद्देष सादर केले.  यावेळी बोलताना अण्णा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला असून पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,बँका व सावकारी जबर कर्जाच्या दबावामुळे गेल्या १२ वर्षात एकूण २२ लाख शेतकºयांनी आत्महत्त्या केल्या आहेत पण माझी शेतकºयांना विनंती आहे की,यापुढे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. राज्या राज्यात कृषीमुल्य आयोग कार्यरत आहेत पण या आयोगाच्या शिफारशीला केंद्र सरकार पन्नास टक्के कात्री लावते हे अन्याकारक आहे असे स्पष्ट करत अण्णा पूढे म्हणाले की, उद्योगपतींना धार्जिणे असलेल्या या केंद्र सरकारला शेतकºयांविषयी अजिबात काळजी नाही. कर्नाटकातील विद्द्यमान महादायी योजनेविषयी चाललेल्या वादविवादावर बोलताना अण्णा म्हणाले की, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून प्रश्न सोडविण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अनेक राज्यांना पाणी वाटपाच्या समस्येने ग्रासले असून नेते असे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यामध्ये राजकीय लाभाचा विचार करून प्रश्र्न लोंबकळत ठेवतात हे लोकशाहीमध्ये अत्यंत लाजीरवाणे आहे. या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे यावेळी सानिध्य लाभले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरanna hazareअण्णा हजारे