शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खरिपासाठी दोन लाख टन खताचे आवंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी ...

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी पाठवले जाते. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टरवर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत खरीप हंगामात सुमारे एक लाख हेक्टर जादा क्षेत्रावर नियोजन केले आहे. यासाठी लागणारे बियाणे, खताचे नियोजन कृषी विभाग मागील एका महिन्यापासून करीत आहे.

यंदा जिल्ह्यात विविध प्रकारच्या दोन लाख ९१ हजार ९०० मे. टन खताची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने कळविले होते. त्यानुसार पुणे कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० टन आवंटन मंजूर केले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ मे. टन खत शिल्लक राहिले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खतांची कमतरता पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मागणी अन‌् मंजूर खत

युरिया एक लाख २५ हजार टन (मागणी), ९३ हजार २५० टन (मंजूर), डीएपी ५० हजार टन (मागणी), ३२ हजार ४५० टन (मंजूर), एमओपी ३२ हजार टन (मागणी), १९ हजार ७५० हजार टन (मंजूर), एसएसपी २२ हजार टन (मागणी), २३ हजार ५५० टन (मंजूर), संयुक्त खते ६२ हजार ९०० टन (मागणी), ४५ हजार ३६० टन (मंजूर) अशी जिल्ह्यात एकूण दोन लाख ९१ हजार ९०० मे. टनाची मागणी केली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ टन खतसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत युरिया तीन हजार ९६६ टन, एमओपी आठ हजार २५३ टन, एसएसपी १३ हजार ९२२ टन, डीएपी आठ हजार ७८३ टन, संयुक्त खते ४६ हजार २६६ असे एक लाख ११ हजार १९० टन उपलब्ध खतापैकी सहा हजार ५१२ टन खतांची विक्री केली आहे.

तालुकानिहाय मंजूर खते

बार्शी ७०० टन, मोहोळ ४०० टन, माढा ७०० टन, माळशिरस १०० टन, करमाळा ३०० टन, पंढरपूर सहा हजार २०० टन, अक्कलकोट ४०० टन असा सुमारे आठ हजार ८०० टन खतांचा संरक्षित साठा ठेवला आहे.

नियोजित पेरणी क्षेत्र

खरीप हंगामात ज्वारी १०० हेक्टर, बाजरी ४९ हजार हेक्टर, सु. बाजरी २१ हजार हेक्टर, भात २५० हेक्टर, तूर ९५ हजार हेक्टर, मूग १९ हजार हेक्टर, उडीद ७० हजार हेक्टर, सं. मका ५५ हजार हेक्टर, भुईमूग सात हजार हेक्टर, सूर्यफूल १२ हजार हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सोयाबीन ६५ हजार हेक्टर, धेंचा ७०० हेक्टर, ताग ८०० हेक्टर अशा तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.