शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी दोन लाख टन खताचे आवंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी ...

खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी पाठवले जाते. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टरवर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत खरीप हंगामात सुमारे एक लाख हेक्टर जादा क्षेत्रावर नियोजन केले आहे. यासाठी लागणारे बियाणे, खताचे नियोजन कृषी विभाग मागील एका महिन्यापासून करीत आहे.

यंदा जिल्ह्यात विविध प्रकारच्या दोन लाख ९१ हजार ९०० मे. टन खताची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने कळविले होते. त्यानुसार पुणे कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० टन आवंटन मंजूर केले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ मे. टन खत शिल्लक राहिले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खतांची कमतरता पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मागणी अन‌् मंजूर खत

युरिया एक लाख २५ हजार टन (मागणी), ९३ हजार २५० टन (मंजूर), डीएपी ५० हजार टन (मागणी), ३२ हजार ४५० टन (मंजूर), एमओपी ३२ हजार टन (मागणी), १९ हजार ७५० हजार टन (मंजूर), एसएसपी २२ हजार टन (मागणी), २३ हजार ५५० टन (मंजूर), संयुक्त खते ६२ हजार ९०० टन (मागणी), ४५ हजार ३६० टन (मंजूर) अशी जिल्ह्यात एकूण दोन लाख ९१ हजार ९०० मे. टनाची मागणी केली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ टन खतसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत युरिया तीन हजार ९६६ टन, एमओपी आठ हजार २५३ टन, एसएसपी १३ हजार ९२२ टन, डीएपी आठ हजार ७८३ टन, संयुक्त खते ४६ हजार २६६ असे एक लाख ११ हजार १९० टन उपलब्ध खतापैकी सहा हजार ५१२ टन खतांची विक्री केली आहे.

तालुकानिहाय मंजूर खते

बार्शी ७०० टन, मोहोळ ४०० टन, माढा ७०० टन, माळशिरस १०० टन, करमाळा ३०० टन, पंढरपूर सहा हजार २०० टन, अक्कलकोट ४०० टन असा सुमारे आठ हजार ८०० टन खतांचा संरक्षित साठा ठेवला आहे.

नियोजित पेरणी क्षेत्र

खरीप हंगामात ज्वारी १०० हेक्टर, बाजरी ४९ हजार हेक्टर, सु. बाजरी २१ हजार हेक्टर, भात २५० हेक्टर, तूर ९५ हजार हेक्टर, मूग १९ हजार हेक्टर, उडीद ७० हजार हेक्टर, सं. मका ५५ हजार हेक्टर, भुईमूग सात हजार हेक्टर, सूर्यफूल १२ हजार हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सोयाबीन ६५ हजार हेक्टर, धेंचा ७०० हेक्टर, ताग ८०० हेक्टर अशा तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.