शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आयुष्यभर कष्टाने जमवलेला पैसा फायनान्समध्ये गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 10:56 IST

काटगावकर फसवणूक प्रकरण; न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या ७३ वर्षीय एसटी ड्रायव्हरची व्यथा

ठळक मुद्देआजवर करण्यात आलेल्या तपासात काटगावकर याच्या बºयाच मालमत्तेचा शोध लागलेला आहेअन्य काही मालमत्तेचा शोध लागला असून त्याची सील करण्याची मागणी करण्यात आली आहेगुंतवणूकदार सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी, धुणीभांडी करणाºया महिला, छोटे-मोठे विक्रेते अशा अनेक लोकांच्या ठेवी आहेत

संताजी शिंदे सोलापूर : आयुष्यभर एसटीचा चालक म्हणून नोकरी केली. निवृत्तीनंतर चांगले व्याज मिळते म्हणून फायनान्समध्ये पैसा गुंतवला. वयाची ७३ वर्षे ओलांडली; मात्र आयुष्याच्या शेवटी फसवणूक झाली. कष्टाचे पैसे परत मिळावेत म्हणून लढा देतोय, अशी खंत एका वृद्धाने व्यक्त केली. वस्तुत: ही व्यथा अनेक गुंतवणूकदारांची आहे काहीजण तर पैशाच्या चिंतेने आजारी पडले आहेत. 

रामेश्वर विशलिंग विभूते (वय ७३, रा. भवानी पेठ, सोलापूर) हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या एस.टी. चे चालक आहेत. निवृत्त झाल्यानंतर व्याज जास्त मिळेल या आशेपोटी पैसे काटगावकर याच्या फायनान्समध्ये गुंतवले. फायनान्स बंद पडला. आयुष्याची पुंजी हातातून निघून गेली. सध्या मिळेल ते काम करून रामेश्वर दिवस काढत आहेत. नरसिंग दहिहांडे यांनी बैलगाडीचा व्यवसाय करून जमा केलेले अडीच लाख रुपये फायनान्समध्ये जमा केले. पैसे गेल्याचे समजताच मुलांनी त्यांना घराबाहेर काढले. आज ते पत्नीसोबत मजुरी करून जगत आहेत. लक्ष्मीकांत सदाशिव इंगळे (वय ६५) यांनी सेवानिवृत्तीनंतर २०१३ साली ५ लाख रुपये गुंतवले होते. पैशाच्या तणावात त्यांची दोनवेळा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शारदा राम परळकर (वय ५५) यांनी ५ लाख गुंतवले आहेत, त्यांना सध्या रक्तदाब (बीपी) चा आजार जडला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे, तारखेच्या दिवशी ठेवीदार येतात. सुनावणी झाली तर ऐकतात, तारीख मिळाली तर निघून जातात. 

काटगावकर खटला अन् पार्श्वभूमी- शेखर रेवणसिद्ध काटगावकर (वय ५३) याने सुरुवातीला भवानी पेठ येथील बलिदान चौकात शासकीय परवाना घेऊन मनिलँडरिंगचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने त्याचे रूपांतर मे. कमर्शियल फायनान्स, रिद्धी-सिद्धी फायनान्स, मे. नवरत्न फायनान्स, मे. हरिओम फायनान्समध्ये झाले. एक हजार ३५५ ठेवीदारांनी ४५ कोटी ८८ लाख तीन हजार ८८० रुपयांच्या ठेवी फायनान्समध्ये ठेवल्या. जानेवारी २०१६ मध्ये फायनान्सने अचानक व्याज देणे बंद केले. ठेवीदारांनी विचारणा केली असता, दोन महिन्यानंतर दिली जाईल असे सांगण्यात आले; मात्र दोन महिन्यानंतर फायनान्सचा मालक शेखर काटगावकर, पत्नी सुकेशनी काटगावकर, नागेश काटगावकर हे तिघे कार्यालय बंद करून पळून गेले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन चंद्रकांत शिंदे (वय ३२, रा. उत्तर कसबा, टिळक चौक, सोलापूर) यांनी दि.२८ एप्रिल २०१६ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी शेखर रेवणसिद्ध काटगावकर (वय ५२), सुकेशनी शेखर काटगावकर (वय ४३, दोघे रा.मंत्री चंडक नगर, भवानी पेठ, सोलापूर), नागेश रेवणसिद्ध काटगावकर (वय ४७, रा. १४५, पश्चिम मंगळवार पेठ, तुळजापूर वेस, सोलापूर) या तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दि.१० मे २०१६ रोजी शेखर काटगावकर याला भवानी पेठेतील कार्यालयातून अटक करण्यात आली होती. सुकेशनी काटगावकर यांना दि.९ मे २0१६ रोजी अटक झाली होती. नागेश काटगावकर फरार होता, त्याने दि.२ जानेवारी २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळवला.  सध्या सुकेशनी काटगावकर व नागेश काटगावकर हे जामिनावर बाहेर आहेत. शेखर काटगावकर हा जेलमध्ये आहे. सध्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. 

आजवर करण्यात आलेल्या तपासात काटगावकर याच्या बºयाच मालमत्तेचा शोध लागलेला आहे. न्यायालयाने सर्व मालमत्ता सील केल्या आहेत. अन्य काही मालमत्तेचा शोध लागला असून त्याची सील करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुंतवणूकदार सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी, धुणीभांडी करणाºया महिला, छोटे-मोठे विक्रेते अशा अनेक लोकांच्या ठेवी आहेत. - अ‍ॅड. संतोष न्हावकर विशेष सरकारी वकील  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी