शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारे सोलापूरचे सिंघम, पोलीस आयुक्त शिंदेंचे अजय देवगणकडून कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Police Commissioner Ankush Shinde : नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  

-  खुशालचंद बाहेती

सोलापूर : नक्षली भागात तळागाळापर्यंत  काम  करुन त्यांनी बंदूक  उचलणाऱ्या  आदिवासींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली  आणि  त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे घरांचे, जमिनीचे, आरोग्य, शिक्षण व  बेकारीचे  प्रश्न समजून घेऊन  ते  सोडवण्यासाठी प्रयत्न केले. नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  या  कामगिरीचे  खुद्द  सिंघम  (अजय  देवणग)  यांनीही कौतुक केले  आहे.  सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  हे  गडचिरोली येथे असताना त्यांनी  नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या  या  कामाची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला  आहे.  गडचिरोली जिल्ह्यात तरुणांचे  ब्रेनवॉश  करून त्यांना सशस्त्र चळवळीत  ओढण्याचे  काम  सातत्याने करण्यात येते. सामान्य  आदिवासीच्या  मनात शासन, प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात येतो. त्यांना न  जुमानणाऱ्यांना  ठार  करून दहशत निर्माण करण्यात येते.  १९८४  पासून जवळपास  ७००  आदिवासींना  ठार  करण्यात  आले  किंवा गंभीर जखमी केले. नक्षली भागात  २२७  पोलिसांना  हौतात्म्य  आले.  यामुळे नक्षलवाद्यांची त्या परिसरात दहशत होती. याला  शह  देण्यासाठी  जून  २०१७  मध्ये गडचिरोली  परिक्षेत्राचा  पदभार घेतल्यानंतर अंकुश शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली होती. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या.  यात  ८८  हजार  ५००  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशवंतराव चव्हाण मुक्त  विद्यापीठामार्फत  १२५३  जणांना पदवी, पदविका शिक्षण दिले. आरोग्य तपासणी, बेरोजगारांचे मेळावे याचा  हजारोंना  लाभ  झाला. पोलिसांनी आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य स्पर्धांमध्ये २ लक्ष  ७४  हजार जणांनी  भाग  घेतला.  आता गडचिरोलीचे  लोक  मुंबई मॅरेथॉन, पुणे-फलटण  या  स्पर्धेतही  सहभागी  होत  आहेत.

विश्वास संपादन केला  ५ लक्ष लोकांपर्यंत पोहोचून  काम  केल्याने आदिवासींचा विश्वास संपादन झाला. आदिवासी माहितीही  देऊ  लागले व  नक्षलवाद्यांना  विरोध  करू  लागले. त्यांच्या माध्यमातून  ५१  पोलिसांचा  बळी  घेणारा  मंगरू  बोगामी  याच्यासह  ४०  लोकांनी  आत्मसमर्पण  केले,  तर  ४ पोलीस व  १९  आदिवासींना  मारणारा  डोळेश  आत्रामसह  ७२ (एकाच दिवशी ४०) एन्काउंटर  झाले.  

टॅग्स :PoliceपोलिसAjay Devgnअजय देवगणSolapurसोलापूर