शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारे सोलापूरचे सिंघम, पोलीस आयुक्त शिंदेंचे अजय देवगणकडून कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Police Commissioner Ankush Shinde : नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  

-  खुशालचंद बाहेती

सोलापूर : नक्षली भागात तळागाळापर्यंत  काम  करुन त्यांनी बंदूक  उचलणाऱ्या  आदिवासींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली  आणि  त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे घरांचे, जमिनीचे, आरोग्य, शिक्षण व  बेकारीचे  प्रश्न समजून घेऊन  ते  सोडवण्यासाठी प्रयत्न केले. नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  या  कामगिरीचे  खुद्द  सिंघम  (अजय  देवणग)  यांनीही कौतुक केले  आहे.  सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  हे  गडचिरोली येथे असताना त्यांनी  नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या  या  कामाची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला  आहे.  गडचिरोली जिल्ह्यात तरुणांचे  ब्रेनवॉश  करून त्यांना सशस्त्र चळवळीत  ओढण्याचे  काम  सातत्याने करण्यात येते. सामान्य  आदिवासीच्या  मनात शासन, प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात येतो. त्यांना न  जुमानणाऱ्यांना  ठार  करून दहशत निर्माण करण्यात येते.  १९८४  पासून जवळपास  ७००  आदिवासींना  ठार  करण्यात  आले  किंवा गंभीर जखमी केले. नक्षली भागात  २२७  पोलिसांना  हौतात्म्य  आले.  यामुळे नक्षलवाद्यांची त्या परिसरात दहशत होती. याला  शह  देण्यासाठी  जून  २०१७  मध्ये गडचिरोली  परिक्षेत्राचा  पदभार घेतल्यानंतर अंकुश शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली होती. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या.  यात  ८८  हजार  ५००  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशवंतराव चव्हाण मुक्त  विद्यापीठामार्फत  १२५३  जणांना पदवी, पदविका शिक्षण दिले. आरोग्य तपासणी, बेरोजगारांचे मेळावे याचा  हजारोंना  लाभ  झाला. पोलिसांनी आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य स्पर्धांमध्ये २ लक्ष  ७४  हजार जणांनी  भाग  घेतला.  आता गडचिरोलीचे  लोक  मुंबई मॅरेथॉन, पुणे-फलटण  या  स्पर्धेतही  सहभागी  होत  आहेत.

विश्वास संपादन केला  ५ लक्ष लोकांपर्यंत पोहोचून  काम  केल्याने आदिवासींचा विश्वास संपादन झाला. आदिवासी माहितीही  देऊ  लागले व  नक्षलवाद्यांना  विरोध  करू  लागले. त्यांच्या माध्यमातून  ५१  पोलिसांचा  बळी  घेणारा  मंगरू  बोगामी  याच्यासह  ४०  लोकांनी  आत्मसमर्पण  केले,  तर  ४ पोलीस व  १९  आदिवासींना  मारणारा  डोळेश  आत्रामसह  ७२ (एकाच दिवशी ४०) एन्काउंटर  झाले.  

टॅग्स :PoliceपोलिसAjay Devgnअजय देवगणSolapurसोलापूर