शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारे सोलापूरचे सिंघम, पोलीस आयुक्त शिंदेंचे अजय देवगणकडून कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Police Commissioner Ankush Shinde : नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  

-  खुशालचंद बाहेती

सोलापूर : नक्षली भागात तळागाळापर्यंत  काम  करुन त्यांनी बंदूक  उचलणाऱ्या  आदिवासींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली  आणि  त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे घरांचे, जमिनीचे, आरोग्य, शिक्षण व  बेकारीचे  प्रश्न समजून घेऊन  ते  सोडवण्यासाठी प्रयत्न केले. नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  या  कामगिरीचे  खुद्द  सिंघम  (अजय  देवणग)  यांनीही कौतुक केले  आहे.  सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  हे  गडचिरोली येथे असताना त्यांनी  नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या  या  कामाची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला  आहे.  गडचिरोली जिल्ह्यात तरुणांचे  ब्रेनवॉश  करून त्यांना सशस्त्र चळवळीत  ओढण्याचे  काम  सातत्याने करण्यात येते. सामान्य  आदिवासीच्या  मनात शासन, प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात येतो. त्यांना न  जुमानणाऱ्यांना  ठार  करून दहशत निर्माण करण्यात येते.  १९८४  पासून जवळपास  ७००  आदिवासींना  ठार  करण्यात  आले  किंवा गंभीर जखमी केले. नक्षली भागात  २२७  पोलिसांना  हौतात्म्य  आले.  यामुळे नक्षलवाद्यांची त्या परिसरात दहशत होती. याला  शह  देण्यासाठी  जून  २०१७  मध्ये गडचिरोली  परिक्षेत्राचा  पदभार घेतल्यानंतर अंकुश शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली होती. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या.  यात  ८८  हजार  ५००  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशवंतराव चव्हाण मुक्त  विद्यापीठामार्फत  १२५३  जणांना पदवी, पदविका शिक्षण दिले. आरोग्य तपासणी, बेरोजगारांचे मेळावे याचा  हजारोंना  लाभ  झाला. पोलिसांनी आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य स्पर्धांमध्ये २ लक्ष  ७४  हजार जणांनी  भाग  घेतला.  आता गडचिरोलीचे  लोक  मुंबई मॅरेथॉन, पुणे-फलटण  या  स्पर्धेतही  सहभागी  होत  आहेत.

विश्वास संपादन केला  ५ लक्ष लोकांपर्यंत पोहोचून  काम  केल्याने आदिवासींचा विश्वास संपादन झाला. आदिवासी माहितीही  देऊ  लागले व  नक्षलवाद्यांना  विरोध  करू  लागले. त्यांच्या माध्यमातून  ५१  पोलिसांचा  बळी  घेणारा  मंगरू  बोगामी  याच्यासह  ४०  लोकांनी  आत्मसमर्पण  केले,  तर  ४ पोलीस व  १९  आदिवासींना  मारणारा  डोळेश  आत्रामसह  ७२ (एकाच दिवशी ४०) एन्काउंटर  झाले.  

टॅग्स :PoliceपोलिसAjay Devgnअजय देवगणSolapurसोलापूर