शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

शेती करणं खरंच गुन्हा आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:16 IST

भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे. पूर्वी ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ ही समाजस्थिती होती. शेतीमालाला मोत्याचं ...

ठळक मुद्देशेतकºयांना दिलेला आश्वासनांचा गृहपाठ कोण कधी पूर्ण करणारच नाही का?आम्ही नवनवीन तंत्रज्ञान, माहिती, शोध संशोधनाच्या बळावर कमालीचे शोध लावलेभारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे.

भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे. पूर्वी ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ ही समाजस्थिती होती. शेतीमालाला मोत्याचं मोल नसलं तरी शेतीला सन्मान, प्रतिष्ठा व शेतकºयांना मानसन्मान होता. गावगाडा आनंदाने चालायचा पण ‘कालाय तस्मै नम:’ म्हणतात ते काही खोटं नाही. काळाचे फासे उलटे पडले, माणसाच्या वागण्या बोलण्यात बदल होत गेला, अधिक हवेची हाव पशुत्वाच्या पातळीला घेऊन गेली.

आम्ही नवनवीन तंत्रज्ञान, माहिती, शोध संशोधनाच्या बळावर कमालीचे शोध लावले. नवनवीन पिके,फळं, पालेभाज्या कोणत्याही ऋतुत कोणत्याही गोष्टी मिळू लागल्या, दिवसाला तीस-चाळीस लिटर दूध देणाºया गाई तर पाचपन्नास लिटर दूध देणाºया  म्हशी उपलब्ध होऊ लागल्या. जमिनीतल्या पाण्याचा बेसुमार वापर औद्योगिकीकरण शेती,कारखानदारी व बेजबाबदारपणे केला जाऊ लागला. तरीही हायब्रिडीकरण वाण व संशोधनामुळे एकंदरीत उत्पादन वाढत गेलं. दुसरीकडे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्याने आयात धोरण स्वीकारावे लागते. पर्यायाने आमच्याकडे उपलब्ध सारं असताना मुबलक उत्पादनामुळे किमान हमीभाव धोरण राबवण्यात अडचणी सांगण्यात येतात. तर दुसरीकडे बी-बियाणे,खते,औषधे,मशागतीचे मळणी मशिनीपासून मजुरापर्यंत सारे वाढते दर भारतीय शेतीचा गळा घोटत आहेत. त्याच्या वाढीबाबत कुणी बोलायला तयार नाही. त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा विचारही कुणी करत नाही. कधीतरी कांद्याला दोन पैसे मिळाले की सामान्य ग्राहकांच्या डोळ्याला पाणी येते. जनता आंदोलनही करते. मग तीच जनता आज शेतकºयांचा सर्व माल दोन-पाच रुपयांनी नव्हे तर पैशांनी विकला जातो तेव्हा शेतकºयांचे  दु:ख पाहून गप्प राहणे. मतासाठी आश्वासनांची खैरात मागताना गळा फाटेपर्यंत केलेली भाषणे कशी विसरतात ?

 शेतकºयांचे नेते कैवारी खुर्चीच्या उबेने सुस्त होताना का दिसतात. आज शेतकºयांना माल रस्त्यावर फेकायला लागतो, दूध ओतून द्यावं लागतं आहे. ना स्वत:च्या ना गाई-म्हशींच्या त्यांच्या बाळांच्या तोंडचं दूध रस्त्यावर ओततानाच्या, घरातील आजारी पोराबाळाचा वा स्वत:च्या जिवाची कसलीही काळजी न करता रात्रंदिवस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक जेव्हा मातीमोलानं विकलं गेल्यानंतर त्यांच्या काळजाला होणाºया यातनाचा अभ्यास करण्यासाठी तरी एखादी समिती नेमता येईल का ? याचा विचार करावा.  हमीभाव देऊ शकत नाही, नका देऊ पण चाळीस पैसे, एक, दोन रुपये किलोचा भाव कोणत्या निकषांवर काढता ते गणित तरी समजावून सांगाल की नाही.

निसर्गाच्या दुष्टकालचक्र कायम आमच्या पाचवीला पूजलेला. हजार विघ्नं, अडचणी, समस्यांशी कडवी झुंज देतानाही न डगमगणारा शेतकरी त्यांच्या कष्टाचं होत असलेलं अवमूल्यन पाहून मात्रं त्याचा होणारा चेहरा व आत्म्याची तळतळाट टिपताना का सारे शांत राहतात. सामान्य शेतकरी कुटुंबातून गेलेली व या व्यवस्थेशी संबंधित अधिकारी, पदाधिकारी व तमाम व्यवस्था हताश होऊन सारं पाहतो. तेव्हा अंतर्मनात एकच प्रश्न उठतो की खरंच आम्ही शेती केली हा गुन्हाच केला का?  हा मूक आक्रोश का कुठल्या कान वा हृदयाच्या  पर्यंत पोहोचत नाही? सगळे जाणते राजे अजाण का होतात?

शेतकºयांना दिलेला आश्वासनांचा गृहपाठ कोण कधी पूर्ण करणारच नाही का? नका देऊ काही. होय आम्ही गुन्हाच केला आहे, करत आहोत, करत राहू कारण आम्ही जगाचे पोशिंदे आहोत,अन्नदाते आहोत काळ्या आईचे पुत्र आहोत. तिच्याशी इमान राखण्याचा गुन्हा करत राहू पण साºया व्यवस्थेला एक नम्र विनंती करतो की किमान, शेतीला जोडव्यवसाय करा, शेतीमालाला प्रक्रिया करण्याचा उद्योग करा, पिकांचं नियोजन करा, सामूहिक शेती करा... वगैरे वगैरे सल्ले देऊन आमच्या दु:खावर डागण्या देऊन आणखी त्रास देऊ नका.  दारात मढं घेऊन बोंब मारणाराला नवी लेकरं जन्माला घाला सांगण्याचा उन्माद तरी करु नका. समाजातील नोकरवर्गांना वर्षात दोनवेळची महागाई एक वेतनवाढ बिनबोभाट तर इकडे कायम संघर्षच ज्यांच्या नशीबात आहे असा शेतकरी सर्वांनाच प्रश्न विचारतोय. शेती करतो आम्ही गुन्हा करतो का..?- रवींद्र देशमुख(लेखक हे उपक्रमशील शिक्षक अन् साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ