शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेती करणं खरंच गुन्हा आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:16 IST

भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे. पूर्वी ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ ही समाजस्थिती होती. शेतीमालाला मोत्याचं ...

ठळक मुद्देशेतकºयांना दिलेला आश्वासनांचा गृहपाठ कोण कधी पूर्ण करणारच नाही का?आम्ही नवनवीन तंत्रज्ञान, माहिती, शोध संशोधनाच्या बळावर कमालीचे शोध लावलेभारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे.

भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे. पूर्वी ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ ही समाजस्थिती होती. शेतीमालाला मोत्याचं मोल नसलं तरी शेतीला सन्मान, प्रतिष्ठा व शेतकºयांना मानसन्मान होता. गावगाडा आनंदाने चालायचा पण ‘कालाय तस्मै नम:’ म्हणतात ते काही खोटं नाही. काळाचे फासे उलटे पडले, माणसाच्या वागण्या बोलण्यात बदल होत गेला, अधिक हवेची हाव पशुत्वाच्या पातळीला घेऊन गेली.

आम्ही नवनवीन तंत्रज्ञान, माहिती, शोध संशोधनाच्या बळावर कमालीचे शोध लावले. नवनवीन पिके,फळं, पालेभाज्या कोणत्याही ऋतुत कोणत्याही गोष्टी मिळू लागल्या, दिवसाला तीस-चाळीस लिटर दूध देणाºया गाई तर पाचपन्नास लिटर दूध देणाºया  म्हशी उपलब्ध होऊ लागल्या. जमिनीतल्या पाण्याचा बेसुमार वापर औद्योगिकीकरण शेती,कारखानदारी व बेजबाबदारपणे केला जाऊ लागला. तरीही हायब्रिडीकरण वाण व संशोधनामुळे एकंदरीत उत्पादन वाढत गेलं. दुसरीकडे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्याने आयात धोरण स्वीकारावे लागते. पर्यायाने आमच्याकडे उपलब्ध सारं असताना मुबलक उत्पादनामुळे किमान हमीभाव धोरण राबवण्यात अडचणी सांगण्यात येतात. तर दुसरीकडे बी-बियाणे,खते,औषधे,मशागतीचे मळणी मशिनीपासून मजुरापर्यंत सारे वाढते दर भारतीय शेतीचा गळा घोटत आहेत. त्याच्या वाढीबाबत कुणी बोलायला तयार नाही. त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा विचारही कुणी करत नाही. कधीतरी कांद्याला दोन पैसे मिळाले की सामान्य ग्राहकांच्या डोळ्याला पाणी येते. जनता आंदोलनही करते. मग तीच जनता आज शेतकºयांचा सर्व माल दोन-पाच रुपयांनी नव्हे तर पैशांनी विकला जातो तेव्हा शेतकºयांचे  दु:ख पाहून गप्प राहणे. मतासाठी आश्वासनांची खैरात मागताना गळा फाटेपर्यंत केलेली भाषणे कशी विसरतात ?

 शेतकºयांचे नेते कैवारी खुर्चीच्या उबेने सुस्त होताना का दिसतात. आज शेतकºयांना माल रस्त्यावर फेकायला लागतो, दूध ओतून द्यावं लागतं आहे. ना स्वत:च्या ना गाई-म्हशींच्या त्यांच्या बाळांच्या तोंडचं दूध रस्त्यावर ओततानाच्या, घरातील आजारी पोराबाळाचा वा स्वत:च्या जिवाची कसलीही काळजी न करता रात्रंदिवस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक जेव्हा मातीमोलानं विकलं गेल्यानंतर त्यांच्या काळजाला होणाºया यातनाचा अभ्यास करण्यासाठी तरी एखादी समिती नेमता येईल का ? याचा विचार करावा.  हमीभाव देऊ शकत नाही, नका देऊ पण चाळीस पैसे, एक, दोन रुपये किलोचा भाव कोणत्या निकषांवर काढता ते गणित तरी समजावून सांगाल की नाही.

निसर्गाच्या दुष्टकालचक्र कायम आमच्या पाचवीला पूजलेला. हजार विघ्नं, अडचणी, समस्यांशी कडवी झुंज देतानाही न डगमगणारा शेतकरी त्यांच्या कष्टाचं होत असलेलं अवमूल्यन पाहून मात्रं त्याचा होणारा चेहरा व आत्म्याची तळतळाट टिपताना का सारे शांत राहतात. सामान्य शेतकरी कुटुंबातून गेलेली व या व्यवस्थेशी संबंधित अधिकारी, पदाधिकारी व तमाम व्यवस्था हताश होऊन सारं पाहतो. तेव्हा अंतर्मनात एकच प्रश्न उठतो की खरंच आम्ही शेती केली हा गुन्हाच केला का?  हा मूक आक्रोश का कुठल्या कान वा हृदयाच्या  पर्यंत पोहोचत नाही? सगळे जाणते राजे अजाण का होतात?

शेतकºयांना दिलेला आश्वासनांचा गृहपाठ कोण कधी पूर्ण करणारच नाही का? नका देऊ काही. होय आम्ही गुन्हाच केला आहे, करत आहोत, करत राहू कारण आम्ही जगाचे पोशिंदे आहोत,अन्नदाते आहोत काळ्या आईचे पुत्र आहोत. तिच्याशी इमान राखण्याचा गुन्हा करत राहू पण साºया व्यवस्थेला एक नम्र विनंती करतो की किमान, शेतीला जोडव्यवसाय करा, शेतीमालाला प्रक्रिया करण्याचा उद्योग करा, पिकांचं नियोजन करा, सामूहिक शेती करा... वगैरे वगैरे सल्ले देऊन आमच्या दु:खावर डागण्या देऊन आणखी त्रास देऊ नका.  दारात मढं घेऊन बोंब मारणाराला नवी लेकरं जन्माला घाला सांगण्याचा उन्माद तरी करु नका. समाजातील नोकरवर्गांना वर्षात दोनवेळची महागाई एक वेतनवाढ बिनबोभाट तर इकडे कायम संघर्षच ज्यांच्या नशीबात आहे असा शेतकरी सर्वांनाच प्रश्न विचारतोय. शेती करतो आम्ही गुन्हा करतो का..?- रवींद्र देशमुख(लेखक हे उपक्रमशील शिक्षक अन् साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ