शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

कृषी वार्ता; यंदाच्या खरीप पेरणीला सर्जाराजाऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 08:17 IST

चपळगाव मंडलात मोठ्या प्रमाणावर होणार खरीपाची पेरणी!

चपळगाव -  शंभूलिंग अकतनाळ

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच देशात बैलजोड्यांच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. बैलांच्या साहाय्याने शेतातील अनेक कामे पार पडतात.मात्र आधूनिक युगात क्रांतीकारक बदल झाल्याने याच बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरने पेरणी करण्याची पध्दत रूढ झाली आहे. यंदाच्या वर्षी चपळगाव मंडलातील बहुतांश शेतकऱ्यांनी सर्जाराजाच्या जोडीला फाटा देऊन ट्रॅक्टरच्या माध्यमातुन खरीपाची पेरणी करत असल्याचे  दिसत आहे.

चपळगाव मंडलातील दहिटणे, चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बावकरवाडी, चुंगी, दर्शनाळ, सिंदखेड, मोट्याळ, नन्हेगाव, बऱ्हाणपूर आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने तुर, उडीद, मुग, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमुग, मका आदी खरीप पिके घेतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते.मात्र सद्यस्थितीत प्रत्येक गावात बैलांची संख्या बोटावर मोजण्याइतपच शिल्लक असल्याने खरीपाची पेरणी वेळेवर कशी करता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.मृग नक्षत्रातील पावसाच्या हजेरीनंतर खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी लगबग करतात.म्हणून यंदाच्या वर्षी बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरच्या माध्यमातुन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

चपळगाव मंडलातील जवळपास २१००० हेक्टर क्षेत्रापैकी  जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर शेतकरी खरीप पिकांची पेरणी करण्याचा अंदाज आहे. यामध्ये उडीद पिकाला बहुतांश शेतकर्‍यांनी पसंती दिली असली तरी मुग,तुर,सूर्यफूल, भुईमूग,सोयाबीन,साळी, पिकांचीदेखील पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

बैलजोड्यांऐवजी ट्रॅक्टरलाच का पसंती?

खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते.यासाठी खरीपातील प्रत्येक पाऊस आणि प्रत्येक दिवस लाखमोलाचा ठरतो.ही बाब लक्षात घेता प्रत्येक शेतकरी खरीप हंगामाची पेरणी वेळेवर करतात.सद्यस्थितीत एका बैलजोडीला प्रतिदिवस १५०० रूपये भाडे मोजावे लागतात.तसेच खते,बियाणेंचा व मजुरांचा खर्च जोडता पेरणीसाठी प्रतिदिन शेतकरी जवळपास ५००० रूपये मोजतो.यामध्ये जवळपास तीन ते चार एकरवर पेरणी होते.याउलट सद्यस्थितीत ट्रॅक्टरला प्रतिएकर ८०० ते ९०० रूपये भाडे द्यावे लागते.ट्रॅक्टरवर एका दिवसात किमान दहा एकरावर पेरणी करणे शक्य होते.ट्रॅक्टरच्या माध्यमातुन बियाणे,खत एकाच वेळी सोडता येते.तसेच बारीक उठलेले तणदेखील मोडले जाते.बैलजोड्यांवर पेरणीसाठी, रासणीसाठी,खत सोडण्यासाठी मजुरांची गरज भासते.या बाबी लक्षात घेता मजुरीचा खर्च,वेळेची बचत,कमी कालावधीत जास्तीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर उपयूक्त ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

बैलजोड्यांवर तीन दिवसांपर्यंत  होणारे काम ट्रॅक्टरने एक-दीड दिवसात पूर्ण होते.शिवाय मजुरीचा खर्च,वेळेची होणारी बचत या बाबी शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी हिताच्या ठरतात.यासाठी मी ट्रॅक्टरने पेरणी केली आहे.

- चिदानंद माळगे(सरपंच,डोंबरजवळगे)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी