शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:16 IST

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी ...

ठळक मुद्देजलसंपदा कार्यालयात ठिय्या आंदोलनसिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली निर्णयाची माहिती पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या संदर्भातील माहिती आंदोलनकर्ते आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. 

म्हेत्रे यांनी तत्पूर्वी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात शेतकºयांसह तासभर ठिय्या आंदोलन केले होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अक्कलकोटसाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता; मात्र कर्नाटक हद्दीतील बरूर आणि हिंगणी या दोन बंधाºयात सध्या पाणी असून, अधिक पाणी सोडण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाचे मत बनले आहे. त्यामुळे त्यांनी हिळ्ळीपर्यंत पाणी सोडण्याऐवजी औज बंधाºयापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे गाºहाणी मांडली. त्याचा फारसा उपयोग न झाल्याने हे शेतकरी आमदार म्हेत्रे यांच्या निवासस्थानी गेले. 

आमदार म्हेत्रे यांनी तातडीने शेतकºयांसमवेत जलसंपदा विभागाच्या गुरूनानक कार्यालयाकडे धाव घेतली. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला साळे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते पंढरपुरात असल्याचे सांगण्यात आले. साळे यांनी पाणी  सोडण्याबाबत अडचण आहे. मी आपल्याशी समक्ष बोलतो, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शेतकºयांनी आजच पाण्याचा निर्णय व्हायला, असा आग्रह आमदार म्हेत्रे यांच्याकडे धरला त्यामुळे हा सगळा जत्था जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली. याचवेळी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि  राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला.

शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात असेपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला पाहिजे, यावर आमदार म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाळासाहेब शेळके, उमेश पाटील ठाम राहिले. जिल्हाधिकाºयांनीही जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान, या विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी हिळ्ळी बंधारा भरेपर्यंत भीमा आणि सीना नद्यातून पाणी सोडण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिल्या. साळे यांनी ही माहिती आमदार म्हेत्रे यांना दूरध्वनीवरून कळविली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात सुरेश हसापुरे, अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, अण्णाराव याबाजी, शिवयोगी लाळसंगी, भिमाशंकर विजापूरे, कोर्सेगांवचे सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील, मल्लिनाथ पाटील, महादेव पाटील, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ४०० शेतकरी सहभागी होते.

याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले. उजनी धरणातील पाणी सीना व भीमा नदीत टेल टू हेड या शासनाच्या धोरणानुसार सोडण्यात यावे, यंदा जिल्ह्यात पाऊस नाही, सोलापूर जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्कलकोट तालुका दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.

थेट संपर्काने सुटला तिढाच्सीनेच्या पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी करीत होते. अधीक्षक अभियंता धीरज साळे कार्यालयात नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. आमदार म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. हा विषय धोरणात्मक निर्णयाचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधला. शेतकºयांच्या संतप्त भावना कळविल्या. समितीच्या निर्णयाची आठवण करून देताच मंत्र्यांनी चिंता करू नका, मी आदेश आत्ताच देतो, असे आश्वासित केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीUjine Damउजनी धरणGirish Mahajanगिरीश महाजन