शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:16 IST

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी ...

ठळक मुद्देजलसंपदा कार्यालयात ठिय्या आंदोलनसिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली निर्णयाची माहिती पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या संदर्भातील माहिती आंदोलनकर्ते आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. 

म्हेत्रे यांनी तत्पूर्वी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात शेतकºयांसह तासभर ठिय्या आंदोलन केले होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अक्कलकोटसाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता; मात्र कर्नाटक हद्दीतील बरूर आणि हिंगणी या दोन बंधाºयात सध्या पाणी असून, अधिक पाणी सोडण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाचे मत बनले आहे. त्यामुळे त्यांनी हिळ्ळीपर्यंत पाणी सोडण्याऐवजी औज बंधाºयापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे गाºहाणी मांडली. त्याचा फारसा उपयोग न झाल्याने हे शेतकरी आमदार म्हेत्रे यांच्या निवासस्थानी गेले. 

आमदार म्हेत्रे यांनी तातडीने शेतकºयांसमवेत जलसंपदा विभागाच्या गुरूनानक कार्यालयाकडे धाव घेतली. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला साळे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते पंढरपुरात असल्याचे सांगण्यात आले. साळे यांनी पाणी  सोडण्याबाबत अडचण आहे. मी आपल्याशी समक्ष बोलतो, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शेतकºयांनी आजच पाण्याचा निर्णय व्हायला, असा आग्रह आमदार म्हेत्रे यांच्याकडे धरला त्यामुळे हा सगळा जत्था जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली. याचवेळी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि  राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला.

शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात असेपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला पाहिजे, यावर आमदार म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाळासाहेब शेळके, उमेश पाटील ठाम राहिले. जिल्हाधिकाºयांनीही जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान, या विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी हिळ्ळी बंधारा भरेपर्यंत भीमा आणि सीना नद्यातून पाणी सोडण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिल्या. साळे यांनी ही माहिती आमदार म्हेत्रे यांना दूरध्वनीवरून कळविली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात सुरेश हसापुरे, अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, अण्णाराव याबाजी, शिवयोगी लाळसंगी, भिमाशंकर विजापूरे, कोर्सेगांवचे सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील, मल्लिनाथ पाटील, महादेव पाटील, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ४०० शेतकरी सहभागी होते.

याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले. उजनी धरणातील पाणी सीना व भीमा नदीत टेल टू हेड या शासनाच्या धोरणानुसार सोडण्यात यावे, यंदा जिल्ह्यात पाऊस नाही, सोलापूर जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्कलकोट तालुका दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.

थेट संपर्काने सुटला तिढाच्सीनेच्या पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी करीत होते. अधीक्षक अभियंता धीरज साळे कार्यालयात नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. आमदार म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. हा विषय धोरणात्मक निर्णयाचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधला. शेतकºयांच्या संतप्त भावना कळविल्या. समितीच्या निर्णयाची आठवण करून देताच मंत्र्यांनी चिंता करू नका, मी आदेश आत्ताच देतो, असे आश्वासित केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीUjine Damउजनी धरणGirish Mahajanगिरीश महाजन