शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:16 IST

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी ...

ठळक मुद्देजलसंपदा कार्यालयात ठिय्या आंदोलनसिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली निर्णयाची माहिती पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या संदर्भातील माहिती आंदोलनकर्ते आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. 

म्हेत्रे यांनी तत्पूर्वी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात शेतकºयांसह तासभर ठिय्या आंदोलन केले होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अक्कलकोटसाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता; मात्र कर्नाटक हद्दीतील बरूर आणि हिंगणी या दोन बंधाºयात सध्या पाणी असून, अधिक पाणी सोडण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाचे मत बनले आहे. त्यामुळे त्यांनी हिळ्ळीपर्यंत पाणी सोडण्याऐवजी औज बंधाºयापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे गाºहाणी मांडली. त्याचा फारसा उपयोग न झाल्याने हे शेतकरी आमदार म्हेत्रे यांच्या निवासस्थानी गेले. 

आमदार म्हेत्रे यांनी तातडीने शेतकºयांसमवेत जलसंपदा विभागाच्या गुरूनानक कार्यालयाकडे धाव घेतली. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला साळे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते पंढरपुरात असल्याचे सांगण्यात आले. साळे यांनी पाणी  सोडण्याबाबत अडचण आहे. मी आपल्याशी समक्ष बोलतो, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शेतकºयांनी आजच पाण्याचा निर्णय व्हायला, असा आग्रह आमदार म्हेत्रे यांच्याकडे धरला त्यामुळे हा सगळा जत्था जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली. याचवेळी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि  राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला.

शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात असेपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला पाहिजे, यावर आमदार म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाळासाहेब शेळके, उमेश पाटील ठाम राहिले. जिल्हाधिकाºयांनीही जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान, या विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी हिळ्ळी बंधारा भरेपर्यंत भीमा आणि सीना नद्यातून पाणी सोडण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिल्या. साळे यांनी ही माहिती आमदार म्हेत्रे यांना दूरध्वनीवरून कळविली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात सुरेश हसापुरे, अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, अण्णाराव याबाजी, शिवयोगी लाळसंगी, भिमाशंकर विजापूरे, कोर्सेगांवचे सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील, मल्लिनाथ पाटील, महादेव पाटील, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ४०० शेतकरी सहभागी होते.

याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले. उजनी धरणातील पाणी सीना व भीमा नदीत टेल टू हेड या शासनाच्या धोरणानुसार सोडण्यात यावे, यंदा जिल्ह्यात पाऊस नाही, सोलापूर जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्कलकोट तालुका दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.

थेट संपर्काने सुटला तिढाच्सीनेच्या पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी करीत होते. अधीक्षक अभियंता धीरज साळे कार्यालयात नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. आमदार म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. हा विषय धोरणात्मक निर्णयाचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधला. शेतकºयांच्या संतप्त भावना कळविल्या. समितीच्या निर्णयाची आठवण करून देताच मंत्र्यांनी चिंता करू नका, मी आदेश आत्ताच देतो, असे आश्वासित केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीUjine Damउजनी धरणGirish Mahajanगिरीश महाजन