शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर जिल्ह्यात आठ टँकर अन् पाच छावण्या तातडीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 8:50 PM

निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती : दोन दिवसात केली उपाययोजना

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता.मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. या उपक्रमात तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. 

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, पाणीच मिळत नसल्याची तक्रार यावेळी काही महिला सरपंचांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गावात तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित विभागास मागणी आलेल्या ठिकाणी तातडीने प्रस्ताव सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार टंचाई असणाºया गावात ६ खासगी बोअरवेलही ताब्यात घेण्यात आले आहेत. या माध्यमातूनही टंचाई गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांकडून आलेल्या मागणीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

सोमवारपर्यंत मागणी आलेल्या गावांची पाहणी करण्यात आली. मंगळवारी मागणी आलेल्या सर्व ठिकाणी टँकर, छावण्या देण्याची व्यवस्था करण्यात आली. 

पीकविमा योजनेचा अहवाल अप्राप्तच्पीकविमा योजनेत शेतकºयांना मदत देताना दुजाभाव करण्यात आला असल्याची तक्रार एका सरपंचाने मुख्यमंत्री यांच्याकडे संवादादरम्यान केली होती. काही शेतकºयांना तीन हजार तर काही शेतकºयांना त्याच पिकासाठी तिवढ्याच क्षेत्रासाठी तीस हजारांपर्यंत मदत देण्यात आल्याची बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते, मात्र हा अहवाल आपल्याकडे आला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय