शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:32 IST

जाणून घ्या कोणत्या शाखेला किती जागा उपलब्ध ?

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणारइंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होत आहे. शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी ही माहिती दिली. वालचंद महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार आहेत. २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

 पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.

दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

महाविद्यालयीनस्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ जुलैला समाप्त करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून महाविद्यालये नियमितपणे सुरु होणार आहेत. प्राचार्यांच्या अधिकारात असलेल्या रिक्त जागांवरील प्रवेश हे २५ जुलैपर्यंत सुरु असणार आहेत. 

शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवेश घेताना अडचण येणार नाही. मात्र यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी विशिष्ट अशा महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा हट्ट सोडायला हवा. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या बैठकीस शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे, वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय शहा, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. 

सोलापूर जिल्ह्यातील शाखानिहाय उपलब्ध जागा

  • - कला - २८ हजार ६८०
  • - विज्ञान - २० हजार ९६०
  • - वाणिज्य - ६ हजार ९६०
  • - संयुक्त शाखा - २ हजार ४४०
  • - एकूण जागा - ५९ हजार ४०
  • - उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - ५२ हजार ५९६
टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी