शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:32 IST

जाणून घ्या कोणत्या शाखेला किती जागा उपलब्ध ?

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणारइंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होत आहे. शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी ही माहिती दिली. वालचंद महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार आहेत. २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

 पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.

दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

महाविद्यालयीनस्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ जुलैला समाप्त करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून महाविद्यालये नियमितपणे सुरु होणार आहेत. प्राचार्यांच्या अधिकारात असलेल्या रिक्त जागांवरील प्रवेश हे २५ जुलैपर्यंत सुरु असणार आहेत. 

शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवेश घेताना अडचण येणार नाही. मात्र यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी विशिष्ट अशा महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा हट्ट सोडायला हवा. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या बैठकीस शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे, वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय शहा, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. 

सोलापूर जिल्ह्यातील शाखानिहाय उपलब्ध जागा

  • - कला - २८ हजार ६८०
  • - विज्ञान - २० हजार ९६०
  • - वाणिज्य - ६ हजार ९६०
  • - संयुक्त शाखा - २ हजार ४४०
  • - एकूण जागा - ५९ हजार ४०
  • - उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - ५२ हजार ५९६
टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी