शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

By appasaheb.patil | Updated: June 11, 2019 13:26 IST

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

ठळक मुद्दे पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत - वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश

सोलापूर : पावसामुळे वीजयंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड होत असतो़ तत्पूर्वी संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत़ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. अशातच जोरदार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढत असते़ तत्पूर्वी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व नागरिकांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो़ तो होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा काय काय करणार आहे ?उत्तर : अतिवृष्टी, वादळी वाºयासह पडणाºया पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब पडण्याचे प्रमाण वाढते़ त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होत असतो़ वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणची विशेष टीम कार्यरत असणार आहे.

प्रश्न : तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आपली काय यंत्रणा आहे ?उत्तर : वादळ तसेच पावसामुळे अथवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती काम करून घेण्यासाठी संंबंधित अभियंत्यांची टीम काम करणार आहे़ दरम्यान, काम करण्यास वेळ लागत असल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर तो कधी सुरू होणार आहे, किती वेळ लागणार आहे याबाबत वीजग्राहकांना काहीच माहीत नसते त्याबद्दल काय सांगाल ?उत्तर : जर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास तर संबंधित त्या भागातील अभियंत्यांनी त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना द्यावी़ शिवाय वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध असणार आहे त्यावरही ग्राहक तक्रार अथवा माहिती घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : पावसाळ्यात वीजग्राहकांनी काय काय काळजी घ्यावी?उत्तर : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी़ तुटलेल्या, लोंबकळणाºया वीजतारांपासून सावध राहावे, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसPower Shutdownभारनियमन