शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

By appasaheb.patil | Updated: June 11, 2019 13:26 IST

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

ठळक मुद्दे पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत - वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश

सोलापूर : पावसामुळे वीजयंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड होत असतो़ तत्पूर्वी संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत़ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. अशातच जोरदार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढत असते़ तत्पूर्वी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व नागरिकांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो़ तो होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा काय काय करणार आहे ?उत्तर : अतिवृष्टी, वादळी वाºयासह पडणाºया पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब पडण्याचे प्रमाण वाढते़ त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होत असतो़ वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणची विशेष टीम कार्यरत असणार आहे.

प्रश्न : तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आपली काय यंत्रणा आहे ?उत्तर : वादळ तसेच पावसामुळे अथवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती काम करून घेण्यासाठी संंबंधित अभियंत्यांची टीम काम करणार आहे़ दरम्यान, काम करण्यास वेळ लागत असल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर तो कधी सुरू होणार आहे, किती वेळ लागणार आहे याबाबत वीजग्राहकांना काहीच माहीत नसते त्याबद्दल काय सांगाल ?उत्तर : जर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास तर संबंधित त्या भागातील अभियंत्यांनी त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना द्यावी़ शिवाय वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध असणार आहे त्यावरही ग्राहक तक्रार अथवा माहिती घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : पावसाळ्यात वीजग्राहकांनी काय काय काळजी घ्यावी?उत्तर : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी़ तुटलेल्या, लोंबकळणाºया वीजतारांपासून सावध राहावे, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसPower Shutdownभारनियमन