शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

By appasaheb.patil | Updated: June 11, 2019 13:26 IST

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

ठळक मुद्दे पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत - वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश

सोलापूर : पावसामुळे वीजयंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड होत असतो़ तत्पूर्वी संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत़ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. अशातच जोरदार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढत असते़ तत्पूर्वी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व नागरिकांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो़ तो होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा काय काय करणार आहे ?उत्तर : अतिवृष्टी, वादळी वाºयासह पडणाºया पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब पडण्याचे प्रमाण वाढते़ त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होत असतो़ वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणची विशेष टीम कार्यरत असणार आहे.

प्रश्न : तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आपली काय यंत्रणा आहे ?उत्तर : वादळ तसेच पावसामुळे अथवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती काम करून घेण्यासाठी संंबंधित अभियंत्यांची टीम काम करणार आहे़ दरम्यान, काम करण्यास वेळ लागत असल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर तो कधी सुरू होणार आहे, किती वेळ लागणार आहे याबाबत वीजग्राहकांना काहीच माहीत नसते त्याबद्दल काय सांगाल ?उत्तर : जर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास तर संबंधित त्या भागातील अभियंत्यांनी त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना द्यावी़ शिवाय वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध असणार आहे त्यावरही ग्राहक तक्रार अथवा माहिती घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : पावसाळ्यात वीजग्राहकांनी काय काय काळजी घ्यावी?उत्तर : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी़ तुटलेल्या, लोंबकळणाºया वीजतारांपासून सावध राहावे, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसPower Shutdownभारनियमन