शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शैक्षणिक समुपदेशन, काळाची गरज...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:51 AM

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत. भवितव्य घडण्यासाठी अनेक नवीन क्षेत्रं उपलब्ध झाली आहेत. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत व या सर्व कोर्सेसची शैक्षणिक संस्थातर्फे आक्रमक प्रसिद्धी होत आहे. यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याशिवाय या सर्व कोर्सेसची  व त्यामधील भवितव्य घडणीची योग्य व संपूर्ण माहिती पालक व विद्यार्थी यांना मिळत नाही. अर्धवट माहितीवर भवितव्य दिशा निवडल्यास विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते. 

शैक्षणिक समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेतली जाते व त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन केले जाते. बºयाचवेळा पालकाच्या आग्रहास्तव किंवा इच्छेखातर विद्याशाखा निवडली जाते, परंतु त्यादृष्टीने त्या विषयात विद्यार्थ्यांची क्षमता नसते व त्यामुळे मानसिकताही नसते. म्हणून बºयाचवेळा अपयश येते व विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचतो. 

मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार  सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे सर्व कृतीमध्ये ३० % बुध्यांक व ७० % भावनांकाचा प्रभाव असतो. हल्लीच्या युवा पिढीच्या कृतीवर भावनांचा प्रभाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे कोणतीही कृती करताना विद्यार्थी त्या कृतीचे बुद्धीने विश्लेषण न करता भावनेच्या आहारी जाताना आढळतो. बहुतेकवेळा जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना चुका होतात किंवा चुकीची दिशा निवडली जाते. यासाठी हल्लीच्या युगात पालक फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. मुलांवर (पाल्यांवर) हक्क गाजवताना आपण त्यांच्या भावना ज्याचा भवितव्याशी संबंध आहे, हे लक्षात घेत नाही. 

प्रशिक्षित तज्ज्ञशिक्षक हे विषयतज्ज्ञ असतात त्यांनी दिलेले शिक्षण किंवा समुपदेशन हे त्याविषयाच्या ज्ञानापुरते मर्यादित असते. त्यांच्या शिकवण्याचा किंवा समुपदेशनाचा उपयोग हा विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढविण्यासाठी नक्कीच होतो, परंतु त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी किंवा भावनांशी फारसा संबंध येत नाही. 

विद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस लागणे, हेही महत्त्वाचे आहे. ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही. यासाठी शिक्षक किंवा पालक याशिवाय त्रयस्थ समुपदेशकाची आवश्यकता लागते. समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या स्वभावाचा ज्या वातावरणात विद्यार्थी वाढला आहे. त्या वातावरणाचा विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या भावनिक परिस्थितीचा अभ्यास करतो व त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना वाढीस लागणे व नकारात्मक भावना कमी होणे. यादृष्टीने प्रयत्न करणे हा मानसोपचार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनांकाच्या बरोबर बुद्ध्यांक वाढीस लागतो व विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य भवितव्याच्या दृष्टिकोनातून तयार होते. 

यास्तव विद्यार्थ्याला विविध कोर्सेसची योग्य माहिती, संस्थांची माहिती देण्यासाठी ब्रेन शैक्षणिक सल्ला केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रातर्फे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन योग्य क्षेत्र निवडीस मदत केली जाते. एवढेच नव्हे तर सदर क्षेत्रातील योग्य संस्था निवड अभ्यास करण्याची पद्धती व योग्य नियोजन करून दिले जाते. यशाचे शिखर गाठेपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मागोवा घेतला जातो.- शलाका कुलकर्णी(लेखिका बाल व कुमार मानसोपचार अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा