शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 11:58 IST

आरआरसीनुसार कारवाईस पात्र : नऊ कारखान्यांनी दिली २१ टक्के एफआरपीनुसार रक्कम

ठळक मुद्देपुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांकडे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचे ८८४ कोटी ९२ लाख रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर दर) नुसार थकले आहेत. यापैकी ९ कारखान्यांनी एफआरपीनुसार २१ टक्के रक्कम दिली आहे. हे सर्व ५५ साखर कारखाने आरआरसी (महसुली वसुली दाखला) नुसार कारवाईस पात्र ठरले आहेत.

पुणे सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी विभागातील तीन जिल्ह्यातील ऊस गाळपाचा आढावा ५ डिसेंबर रोजी घेतला. साखर कारखान्याकडून एक ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील झालेले गाळप, पडलेला साखर उतारा, एफआरपीनुसार शेतकºयांची देय रक्कम, दिलेली रक्कम व द्यावयाची राहिलेली रक्कम याची माहिती घेतली. गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील १२, पुणे जिल्ह्यातील १७ व सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या माहितीनुसार एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यापैकी ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ऊस गाळपाला आणल्यानंतर किमान १४ दिवसांत शेतकºयांची एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र पुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही.सहसचांलक पुणे यासंदर्भात तयार केलेल्या पत्रात वरील माहिती दिली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे कारवाई संदर्भात निर्णय घेणार आहेत.

सहकार मंत्र्यांचे कारखाने बंदच..

  • - सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी सिद्धेश्वर कुमठे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लोकमंगल बीबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे हे कारखाने अद्यापही साखर आयुक्त कार्यालयाकडे बंद आहेत. मकाई व मातोश्री लक्ष्मी शुगर हे कारखाने नोव्हेंबरच्या दुसºया पंधरवड्यात सुरू झाले आहेत. 
  • - ५५ कारखान्यांनी एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीचे एफआरपीनुसार १११७ कोटी २१ लाख देणे असून, २३२ कोटी २९ लाख रुपये दिले तर ८८४ कोटी ९२ लाख रुपये थकबाकी आहे.
  • - पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम कारखान्याने १४ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये. विघ्नहार कारखान्याने २८ कोटी रुपये दिले आहेत.
  • - सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने  एफआरपीच्या ८३ टक्के रक्कम दिली आहे. ‘पांडुरंग’ श्रीपूरने  एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम दिली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याने   एफआरपीच्या ७७ टक्के रक्कम दिली आहे.
  • - विठ्ठलराव शिंदे कारखान्याने  ८३ टक्के एफआरपी दिली आहे. लोकनेते कारखान्याने  ८१ टक्के एफआरपी दिली आहे. सासवड माळीने  २८ टक्केच एफआरपी दिली. जय हिंद कारखान्याने  एफआरपीच्या २५ टक्के इतकीच रक्कम दिली आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणे