शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 11:58 IST

आरआरसीनुसार कारवाईस पात्र : नऊ कारखान्यांनी दिली २१ टक्के एफआरपीनुसार रक्कम

ठळक मुद्देपुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांकडे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचे ८८४ कोटी ९२ लाख रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर दर) नुसार थकले आहेत. यापैकी ९ कारखान्यांनी एफआरपीनुसार २१ टक्के रक्कम दिली आहे. हे सर्व ५५ साखर कारखाने आरआरसी (महसुली वसुली दाखला) नुसार कारवाईस पात्र ठरले आहेत.

पुणे सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी विभागातील तीन जिल्ह्यातील ऊस गाळपाचा आढावा ५ डिसेंबर रोजी घेतला. साखर कारखान्याकडून एक ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील झालेले गाळप, पडलेला साखर उतारा, एफआरपीनुसार शेतकºयांची देय रक्कम, दिलेली रक्कम व द्यावयाची राहिलेली रक्कम याची माहिती घेतली. गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील १२, पुणे जिल्ह्यातील १७ व सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या माहितीनुसार एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यापैकी ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ऊस गाळपाला आणल्यानंतर किमान १४ दिवसांत शेतकºयांची एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र पुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही.सहसचांलक पुणे यासंदर्भात तयार केलेल्या पत्रात वरील माहिती दिली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे कारवाई संदर्भात निर्णय घेणार आहेत.

सहकार मंत्र्यांचे कारखाने बंदच..

  • - सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी सिद्धेश्वर कुमठे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लोकमंगल बीबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे हे कारखाने अद्यापही साखर आयुक्त कार्यालयाकडे बंद आहेत. मकाई व मातोश्री लक्ष्मी शुगर हे कारखाने नोव्हेंबरच्या दुसºया पंधरवड्यात सुरू झाले आहेत. 
  • - ५५ कारखान्यांनी एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीचे एफआरपीनुसार १११७ कोटी २१ लाख देणे असून, २३२ कोटी २९ लाख रुपये दिले तर ८८४ कोटी ९२ लाख रुपये थकबाकी आहे.
  • - पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम कारखान्याने १४ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये. विघ्नहार कारखान्याने २८ कोटी रुपये दिले आहेत.
  • - सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने  एफआरपीच्या ८३ टक्के रक्कम दिली आहे. ‘पांडुरंग’ श्रीपूरने  एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम दिली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याने   एफआरपीच्या ७७ टक्के रक्कम दिली आहे.
  • - विठ्ठलराव शिंदे कारखान्याने  ८३ टक्के एफआरपी दिली आहे. लोकनेते कारखान्याने  ८१ टक्के एफआरपी दिली आहे. सासवड माळीने  २८ टक्केच एफआरपी दिली. जय हिंद कारखान्याने  एफआरपीच्या २५ टक्के इतकीच रक्कम दिली आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणे