शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:01 IST

सोलापूर : उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या ...

ठळक मुद्देकालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील पाणी वापराचे नियोजन केले जातेरब्बी हंगामासाठीच्या पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले होते. २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर: उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. यापूर्वी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील पाणी वापराचे नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रब्बी हंगामासाठीच्या पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले होते. 

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार रब्बीसाठी दुसºया पाळीतील पाणी २० जानेवारीपासून सोडण्यात येणार होते. मात्र २० जानेवारीपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सोलापूर शहरासाठी भीमा नदीला पाणी सोडण्यात आले असून औज-चिंचपूर बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी व आवश्यक पाणीसाठा होईपर्यंत धरणातील पाणी साठा ३० टक्क्यांवर येईल असे अधिकाºयांनी सांगितले. उजनी धरणातील सध्याची पाणी पातळी व पुढील उन्हाळा लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी २० फेब्रुवारी दरम्यान सोडण्याचा प्रस्ताव उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचा आहे. त्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळणे आवश्यक आहे. कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीशिवाय कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने लवकर बैठक घेण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

धरणात १९ टीएमसी पाणीउजनी धरणात सध्या ८२.५१ टीएमसी असून यामध्ये मृतसाठा ६३.६६ टीएमसी आहे. १८.८५ टीएमसी पाणी उपयुक्त आहे. धरणाच्या पाण्यावर अधिकाधिक ऊस क्षेत्र अवलंबून आहे व कारखान्यासाठी ऊस तोडणी सुरू असल्याने सध्या शेतकºयांकडून पाण्याची मागणीही नाही. यामुळे रब्बी व उन्हाळी अशा एकाचवेळी फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

पाण्याची शेतकºयांकडून मागणी नाही. धरणात पाणीसाठा लक्षात घेऊन रब्बी व उन्हाळी असे एकाचवेळी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजनPuneपुणे