शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:35 PM

जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी

ठळक मुद्देशासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप

सोलापूर : दीड लाखावरील रक्कम भरा व कर्जमुक्त व्हा असा संदेश शेतकºयांपर्यंत गेल्याने मागील जून महिन्यात २३२६ शेतकºयांनी कर्जापोटी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये भरल्याने शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. एक रकमी परतफेड योजनेतून जिल्हा बँकेला आतापर्यंत १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४० रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी २४ जून रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या सर्वच शेतकºयांचे कर्ज शासनाने भरले असून दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करीत आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे दीड लाखावरील कर्जदार १७ हजार २७३ इतके शेतकरी ‘ग्रीन’ यादीत आले आहेत. यापैकी ३० जूनअखेर ६ हजार ४४६ शेतकºयांनी दीड लाखावरील ४४ कोटी ५० लाख ५९ हजार ३२२ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत.

शासनाने दीड लाखाप्रमाणे ७७ कोटी २७ लाख ४० हजार ३४८ रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांनी  दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा झालेली रक्कम अशी १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४०  रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेला मिळाली आहे. 

एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्यास वेग आला तो जिल्हा बँकेने नव्याने कर्ज देण्याची हमी दिल्यानंतर. प्रशासक अविनाश देशमुख यांनी दीड लाखावरील रक्कम भरणाºयांना पुन्हा पीक पाहून कर्ज देण्यास सुरुवात केल्याने जून या एकाच महिन्यात २३२६ शेतकºयांनी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये कर्ज खात्यावर भरले आहेत. 

शासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी - दीड लाखावरील थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ‘ग्रीन’ यादीतील १० हजार ८२७ शेतकºयांनी अद्यापही दीड लाखावरील रक्कम भरलेली नाही. या शेतकºयांनी १६९ कोटी ९१ लाख ९६ हजार २४५ रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर ९२ कोटी ६६ लाख ६७ हजार ६५० रुपये शासन जमा करणार आहे. यापैकी बहुतेक शेतकरी हे मोठे बागायतदार म्हणून कर्ज दिलेले आहेत. अनेकांना क्षेत्र कमी असताना व द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे.दीड लाखाप्रमाणे २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा झाले आहेत.  

शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील कर्ज तत्काळ भरावे व नव्याने कर्ज घेऊन कर्जमुक्त व्हावे. पीक पाहून कर्ज दिले जाईल. - अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी